तुमच्या घरात रोज देव पूजा होते का? आणि मग त्यात देवपूजेमध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही नित्य नेमाने केल्या पाहिजेत. त्या होत आहेत का? तरच त्या देवपूजेला काहीतरी अर्थ आहेत. कोणत्या गोष्टीत बदल बोलतीये चला जाणून घेऊया.
ज्या घरात रोज देव पूजा होते त्या घरातलं वातावरण सकारात्मक राहत.
त्याचबरोबर घरातल्या लोकांचा देखील कल्याण होत. पण हेच देवपूजा करत असताना देवपूजेमध्ये काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात. पहिली गोष्ट आहे देवघर स्वच्छ पुसून घ्या. अनेक वेळा संगमरवराचा देवघर असत किंवा लाकडाचे देवघर असत आणि त्या देवघरामध्ये कुंकू किंवा हळद सांडत असते आणि हे आपल्याच्यानं पुसलही जात नाही.
कारण अनेक लोक कसे तरी देव ताम्हणात घ्यायचे, त्यांना आंघोळ घालायची आणि ते जागेवर मांडून हळदी कुंकू अक्षता वाहून झालं की झाली पूजा, असा काहींचा समज असतो, मात्र तर तो अत्यंत चुकीचा आहे. कारण देवपूजा करतांना तुम्ही देवघर स्वच्छ केलं पाहिजे आणि कानाकोपरा सगळ्या झाडून पुसून देवघराची स्वच्छता केली पाहिजे.
देवघरामध्ये तेलाचे डाग पडता कामा नये. त्यानंतर देवांना स्नान घालतांना देवतांच्या मूर्ती यांची संपूर्ण स्वच्छता झाली पाहिजे. तांब्याच्या चांदीच्या मूर्ती असतात त्या काळ्या पडतात, त्याच्यावर कुंकू साठून थर जमा होतात. हे रोजच्या रोज स्वच्छ केले गेले पाहिजे.मग त्यानंतर देवतांना गंध लावावे,कारण गंधाकडे देवता आकर्षित होतात.
देवतांनी आपल्या मूर्तींमध्ये आकर्षित व्हावं यासाठी देवतांना चंदन लावणे, अखंड तांदूळ म्हणजेच अक्षता या देवांना वाहिल्यास पाहिजे. देवाची शक्ती त्याकडे आकर्षित होते. विशिष्ट रंगाकडे त्या त्या देवता आकर्षित होतात. उदाहरणार्थ गणपती लाल रंगाकडे, भगवान शिवशंकर पांधऱ्या रंगाकडे विष्णू काकडे रंगांची फुलं त्यांच्या दैवतांना वाहिली जातात.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.