मित्रांनो, आपल्या प्रत्येकाचीच अशी इच्छा असते की आपले मूल अभ्यासात खूपच हुशार असावे. मोठेपणी त्याला भरपूर यश त्याला मिळावे. त्याने प्रगतीकडे वाटचाल करावी असे मनोमन इच्छा असते. परंतु मित्रांनो आपली मुले अभ्यास तर करतात परंतु तो अभ्यास काही मुलांच्या लक्षात राहत नाही. म्हणजेच ते अभ्यास करतात अभ्यास केल्यानंतर काही वेळ हा अभ्यास त्यांच्या लक्षात राहतो. परंतु काही वेळानंतर तो अभ्यास ते विसरून जातात.
त्यामुळे मग आपण पालक वर्ग चिंतेत राहतो की मुलांनी केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहण्यासाठी नेमके काय करावे. तर मित्रांनो आज मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने तुमच्या मुलांनी जो काही अभ्यास केलेला आहे तो अभ्यास त्यांच्या लक्षात राहण्यासाठी नक्कीच मदत होईल.
कुठल्याही परीक्षेत यश मिळवण्यासाठी केलेला अभ्यास लक्षात राहणे खूप महत्वाचे असते. केलेला सर्व अभ्यास लक्षात राहण्यासाठी गणपतीचे अथर्वशीर्षमध्ये काही उपाय सांगितले आहेत. हे उपाय अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत लागू पडतात. आपले मूल अगदी नर्सरी मध्ये असू दे किंवा अगदी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या वयाचे असू देत. प्रत्येकासाठी हे उपाय अगदी समान आहे. हा उपाय कसा करायचा आहे तो आपण जाणून घेऊयात. जे मुले अगदीच लहान आहे त्यांच्या पालकांनी हे उपाय करावे.
मित्रांनो, आपल्या मुलांना अभ्यास करायला बसवताना आपण त्यांना उत्तर दिशेला तोंड करून बसवावे. त्यांना तशी सवय लावावी. दुसरी गोष्ट आपण अथर्वशीर्षाचा पाठ करावा आणि ते करण्यासाठी आठवड्यातील मंगळवार किंवा बुधवार ह्या दिवशी करावा. तसेच आपण गणपती चतुर्थीच्या दिवशी देखील पाठ करायचा आहे.
हा पाठ करताना आपण गणपती बापांना २१ दुर्वा वहायच्या आहेत. आपट्याची पाने अडीच, सफेद रुईची दोन फुले आणि शमी ह्या झाडाची ११ पाने ठेवावीत. जर शमीचे झाड आपल्या जवळपास नसेल तर तुम्ही अपराजिताची पाने देखील ठेवू शकता. जर ह्यामधील काही नसेल तरी चालेल. मात्र आपण दुर्वा व आपट्याची अडीच पाने मात्र नक्की अर्पण करावीत.
हे सर्व अर्पण केल्यानंतर आपण अथर्वशीर्ष पठण करायचे आहे व त्यानंतर आपण हि सर्व सामग्री पिवळ्या किंवा सफेद रंगाच्या वस्त्रात गुंडाळून त्याची एक पोटली म्हणजेच एक पुरचंडी करायची आहे व ती आपण विद्यार्थाजवळ ठेवायची आहे.
तर मित्रांनो ही पोटली तुम्हाला तुमची मुल जेव्हा अभ्यास करत असेल त्यावेळेस त्याच्या खोलीत म्हणजेच त्याच्या आसपास कशी ही पोटली राहील याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे त्याच्या खोलीमध्ये ही पोटली म्हणजेच पुरचंडी तुम्हाला ठेवायची आहे.यामुळे तो जो काही अभ्यास करील तो सर्व काही त्याच्या लक्षात राहील.
जेव्हा जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची पूजा कराल तेव्हा आपल्या मुलाला जवळ घेऊन आपण अथर्वशीर्षाचा पाठ करायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी हा उपाय केल्यामुळे तुमच्या मुलांनी जो काही अभ्यास केलेला आहे तो लक्षात राहण्यास मदत होईल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल त्यांची सुरू होईल. तर हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.