रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर बोला हा इच्छापूर्ती मंत्र..

अध्यात्मिक माहिती

प्रत्येक जण स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला सुखी ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो, आपलं जीवन सुखी व समृद्ध असावं असं प्रत्येकाला वाटतं. जीवनातील आनंद संपू नये, जर दुःख आले तर आपलं घर त्यात कोसळून न जाता धीराने सामोरं जाण्याची ताकद प्रत्येकाला हवी असते. हे बळ अंगी येण्यासाठी आपण जास्तीत जास्त भक्ती करायला हवी, मेहनत करताना प्रामाणिकपणे केली पाहिजे. सतत वाद न घालता विचार करून वागायला हवं.

आपल्या माणसांचा अपमान करू नये, विनाकारण कोणतीही नकारात्मक भूमिका करू नये, निरंतर कष्ट करावेत, आपलं जीवन सुखी करण्यासाठी, आपली प्रत्येक इच्छा देव पूर्ण करेल जर आपण हा एक उपाय, हा मंत्र जप केला तर. आपल्या शास्त्राचेअनन्यसाधारण महत्व आहे. यासाठी आपण परमेश्वराची आराधना करावी, याशिवाय काही मंत्र जप केले तर ही समस्या दूर करण्यासाठी मदत होते.

काही लोक परमेश्वराच्या अस्तित्वावर टीका करतात किंवा त्याचे नामस्मरण करत नाहीत, पण अशा व्यक्ती एक ना एक दिवस अशा व्यक्तींना ते अस्तित्व मान्य करणे भाग पडते. त्या घरामध्ये नक्की गरिबी येते . आपल्याकडे पैसा किंवा धन असावे, अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते. पौराणिक काळ असो वा आधुनिक काळ पैश्यांशिवाय कोणतेही काम करणे अशक्य असते. त्यामुळे मानवी जीवनात धनसंपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

कारण आजच्या काळात पैसा हे विनियमचे साधन बनले आहे.तसेच आपल्याला कधी कधी चांगल्या काळात यश मिळत असतं , त्यामुळे पैसा आपल्याकडे धावत येतो. माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहते. मात्र कधीकधी वाईट वेळ जर आल्यास तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुमच्या हातांना यश मिळत नाही.

पैसा मिळत नाही. आणि म्हणून सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना किमान एकदा तरी देवाचं नाव, परमेश्वराच्या नावाचा जप आपल्याला केला पाहिजे. हा मंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपताना कधीही केल्यास आपल्या नशीबातील दोष दूर होण्यास मदत होईल.

आपण रोज एक वेळ तरी भगवान श्री कृष्णाच्या नावाचा जप करावा.कारण भगवान श्री विष्णू हे जगाचे पालनकर्ता आहेत. ईश्वराच्या नावाच्या जपामुळे आपल्या अनेक समस्या नाहीशा होतील. ” हरे राम हरे राम, राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ” हा अत्यंत पवित्र मंत्र जपामुळे ,आपलं जीवन आमूलाग्रपणे बदल होऊ शकतात.

याशिवाय आपण “कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेष नाशाय गोविंदाय नमो नमः” या मंत्राचा जप करू शकतो. त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व प्रकारची संकटे आणि दुःख , वाईट वेळ तसेच आपल्या जीवनातील क्लेष दूर होण्यास मदत होते. यासह आपल्या जीवनातून निराशा दूर करण्यासाठी “हरे राम हरे राम राम राम हरे हरे” या प्रभावी मंत्राचा जप करू शकतो.

तसेच आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारची धनाशी संबंधीत समस्या असल्यास या दुसऱ्या मंत्राचा जप करावा. तसेच ज्या लोकांना पैशांच्या समस्या किंवा पैसा घरात टिकत नसेल अशा लोकांसाठी भगवान श्री कृष्णाचाच दुसरा मंत्र “गोवल्लभाय स्वाहा गोवल्लभाय स्वाहा गोवल्लभाय स्वाहा” या पवित्र मंत्राचा सव्वा लाख वेळा जप करावा.

जर हे शक्य नसल्यास आपण रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी “गोवल्लभाय स्वाहा” हा मंत्र जप केला तरीही चालेल. आपल्याला जीवनात कधीच धनाची कमतरता भासणार नाही. भगवान विष्णू त्यांच्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. भक्ताने प्रामाणिक भक्ती केल्यास त्याचे खूप मोठे फळ त्याच्या पदरात पडते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *