नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो हा लेख आपल्यासाठी खूप फायदाच आहे त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा ही विनंती. कर्जमुक्ती मिळवण्यासाठी हे 5 अचूक तोडगे करून पहा. असे अनेक लोक असतात जे आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी कर्ज घेतात. ज्या लोकांनी कमी रकमेचे कर्ज घेतले आहे ते तर सहजच आपले कर्ज फेडण्यात यशस्वी होतात. पण ज्यांनी मोठ्या रकमेचे कर्ज घेतलेले असते त्यांना कर्ज फेडण्यासाठी खूप समस्यांचा सामना करावा लागतो.
तर काही लोक असे असतात जे एकामागून एक कर्ज घेत राहतात आणि मग कर्ज पेलवेनासे असे होते आणि ते परत फेडण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये नसते. अशा प्रकारचे लोक इच्छा असून देखील कर्ज फेडू शकत नाही. शास्त्रांमध्ये कर्ज घेणे आणि देणे यासंबंधी काही उल्लेख आहे. आणि शास्त्रामध्ये लवकर कर्ज फेडण्यासाठी काही उपाय सुचविलेले आहेत. आणि या उपायाच्या मदतीने कोणीही व्यक्ती कमी वेळात कर्जापासून मुक्ती मिळवू शकतो.
मित्रांनो जाणून घेऊया कर्जमुक्तीसाठी 5 प्रभावी उपाय. 1) गायत्री मंत्राचा जप – ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात कर्जमुक्तीच्या या उपायांमध्ये आसपास 5 रंगाचे गुलाब आणि एक पांढरे वस्त्र यांची आवश्यकता आहे. हे वस्त्र दीड मीटर घ्यावे.
त्यानंतर आपण सगळे गुलाब या कपड्यांमध्ये ठेवावे आणि गायत्री मंत्राचा एकवीस वेळा जप करावा. जप करता करता आपण या कपड्यात बांधावे. जप पूर्ण झाल्यावर या कपड्याने बांधलेले गुलाब कोणत्याही नदी किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे.
हा उपाय केल्यानंतर काही दिवसांतच आपल्यावरील कर्ज कमी होत असल्याचे तुम्हाला दिसून येईल. जर ज्या लोकांवर कर्जाचे ओझे अधिक आहे आणि हा उपाय करणे शक्य नसेल तर त्यांनी फक्त गायत्री मंत्राचा दररोज 1 माळ जरी केला तरी खूप फायदेशीर ठरेल.
2) नारळ आणि काळा धागा – कर्ज मुक्ती मिळवण्यासाठी दुसरा उपाय करण्यासाठी आपल्याला काळा धागा आणि नारळी यांची गरज लागेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या उंची एवढा एक काळा धागा लागेल. या धाग्याने आपली उंची मोजल्यानंतर हा काळा धागा नारळावर गुंडाळावा. यानंतर या नारळाची पूजा करा आणि पूजा झाल्यानंतर हा नारळ नदीमध्ये प्रवाहित करा परंतु लक्षात ठेवा हा उपाय फक्त शनिवारच्या दिवशी करावा.
3) मसूर डाळ – मसूर डाळ देवास अर्पण केल्याने देखील कर्ज कमी होते. हा उपाय करण्यासाठी सोमवारी अथवा मंगळवारी शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण करावे. अर्पण करताना ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः या मंत्राचा जप करत राहावे.
4) मोहरीचे तेल किंवा राईचे तेल – शनिवारच्या दिवशी आपण एक मातीच्या दिव्यांमध्ये मोहरीचे तेल टाकावे. आणि नंतर हा दिवा वरून व्यवस्थित झाकावा. या दिव्याला झाकल्यानंतर आपण नदीकिनारी जाऊन तेथे 1 खडा बनवून या दिव्यस खड्ड्यामध्ये पुरावे. हे सगळे केल्यानंतर मागे न पाहता सरळ आपल्या घरी यावे.
5) नारळ आणि चमेली तेल – आपण चमेलीच्या तेलामध्ये शेंदूर मिक्स करून 1 टिळा बनवावा आणि नंतर या टिळ्याने नारळावर स्वस्तिक बनवा. त्यानंतर हा नारळ मारुतीला अर्पण करावा. या नारळासोबत मारुतीला नैवेद्य द्यावे आणि सोबतच ऋणमोचक मंगल स्तोत्र वाचावे. हा उपाय केल्यावर आपल्याकडे धन येण्यास सुरुवात होईल ज्यामुळे आपण कर्ज परत करू शकता.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.