श्री स्वामी समर्थांना नवस कसा करावा, कसा बोलवा? कोणतीही इच्छा पूर्ण होईल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो,

श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या काही इच्छा आहेत का? तुम्हाला कोणता नवस बोलायचं आहे काय? नवस करायचं आहे काय? भरपूर लोकांच्या मनात कोणत्या ना कोणत्या ना इच्छा असतात. त्यांना नवस करायचा असतो.
खास करून स्वामी समर्थांना.

जर तुम्हाला सुद्धा श्री स्वामी समर्थांना नवस कसा करावा. हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल किंवा तुम्हाला कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर ही माहिती पूर्ण वाचा. यामध्ये तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांना नवस कसा करावा, नवस कसा बोलवा,

आणि आपल्या इच्छा, आपल्या मनातल्या इच्छा कशा पूर्ण करून घ्याव्यात. तर मित्रांनो स्वामींना नवस करायचे असेल, बोलायचे असेल तर एकदम सोपी सरळ पद्धत आहे. आणि ती घरच्या घरी राहून करू शकतो.

तुम्हाला यासाठी खूप मोठे काम किंवा खूप मोठी पूजा करायची गरज नसते. तुम्ही फक्त स्वामी समर्थांसमोर बसायचे आहे. स्वामींचा फोटो, स्वामींची मूर्ती तुमच्या घरात असेलच. तर तुम्ही त्या मूर्तीसमोर, त्या फोटोसमोर बसा, दिवा अगरबत्ती लावा.

स्वामींसमोर मुजरा करा, त्यांच्या पाया पडा, प्रार्थना करा
आणि हात जोडून स्वामींकडे बगत तुम्हाला जे बोलायचे आहे, जे हवं आहे, जे संकट समस्या आहेत त्या बोला.
तुम्हाला जो नवस करायचं आहे तो बोला. आणि स्वामींना प्रार्थना करा की,

हे स्वामी समर्था माझा हा नवस आहे हा लवकरात लवकर पूर्ण करा. आणि तुमच्याकडून जे शक्य असेल, जे तुम्ही करू शकत असाल ते तुम्ही स्वामींना बोला की, स्वामी मी तुमच्या अक्कोलकोटला येईन जर तुम्ही हा माझा नवस पूर्ण कराल.

स्वामी ही गोष्ट सोडून देईन, स्वामी हे करेन म्हणजे तुम्हाला जे करावं असं वाटत असेल ते तुम्ही नक्की बोलावं की, स्वामी मी 11 लहान मुलांना, गरिबांना जेवण खाऊ घालेन किंवा मी दान करेन हा नवस करताना बोलायच असत.

आणि जेव्हाही किती दिवसात, किती महिन्यात तुमचा नवस जर पूर्ण झाला तर जे तुम्ही बोला आहात ते तुम्ही नक्की पूर्ण करा. तर तुमच्यावर कोणतेही संकट, अडचणी येणार नाहीत. जर तुम्ही जे बोला आहात नवस करताना आणि ते तुम्ही विसरलात तर तुमच्या अडचणी वाढू शकतात ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा.

नवस साधा सरळ स्वामींसमोर बसून हात जोडून तुम्हाला बोलायचं असत. बोलताना तुम्ही जे करू शकत असाल, नवस झाल्यावर ते नक्की बोला. स्वामी मी हे करेन, ते करेन, यांना दान करेन,

गरिबांना जेवण करेन किंवा मी अक्कोलकोटला येईन. तुमचे दर्शन घेईन हे नक्की बोला तरच तुमचं नवस पूर्ण होईल आणि स्वामींची सेवा सुद्धा सुरू ठेवा.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *