तुमच्या तळहातावर असा अर्धचंद्र बनतो का? जाणून घ्या महत्व.

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

सामुद्रिक शास्त्रांमध्ये शरीरावरील तिळ आणि निशाणी त्यांचे खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे हातावरील विभिन्न रेषा, तसेच भाग्यरेषा, मस्तक रेषा, हृदय रेषा, मंगल रेषा इत्यादी रेषांशिवाय चिन्ह, शंख, चक्र, मंदिर आणि स्वस्तिक हाताचे आकार यावरून मनुष्याच्या भूतकाळ, भविष्यकाळ व वर्तमानकाळ त्याचबरोबर मनुष्याचा स्वभाव व व्यक्तिमत्त्व याबद्दल माहिती कळते. तसेच बोटांची लांबी, आकार, नखांवरील चिन्ह यावरून व्यक्तीची शारीरिक स्थिती व भविष्याची माहिती मिळते.

सामुद्रिक शास्त्र भविष्य बघण्याचे एक प्राचीन विज्ञान आहे. विष्णु पुराणात वर्णन केलेल्या एका कथेनुसार हे शास्त्र माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना सांगितले होते आणि भगवान विष्णूंनी ते ऐकून त्या शास्त्राचा प्रसार केला होता म्हणून या शास्त्राला सामुद्रिक शास्त्र असे म्हणतात. हाताच्या रेषा, पर्वत, नखांची ठेवण आणि विभिन्न चिन्ह त्यांच्या ग्रहण अध्यायाने या विद्येचा विकास झाला आहे.

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये हातावर आढळणारे काही विशेष चिन्ह ते छोट्या रेषाने बनतात त्याचे महत्व पाहणार आहोत. तसेच आपल्या नखांवर चंद्राकार आकृती होते त्याचा नेमका अर्थ काय आहे हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. प्रथम जाणून घेऊया हातांवर बनलेल्या चिन्हाविषयी.

ज्या लोकांच्या हातावर शंखाचे चिन्ह असते ते निश्चित रूपाने धनवान बनतात. अशा लोकांना जीवनात धनाची कधीही कमतरता पडत नाही. त्यांचा स्वभाव दृढनिश्चयी असतो. तसेच हाताच्या पंजावर माशाचे चिन्ह असणे हे सौभाग्याचे ऐश्वर्याचे प्रतीक असते. काही लोकांमध्ये हाताच्या पंजावर असे लहानपणापासूनच असते.

पण काही लोकांमध्ये अर्धा आयुष्य गेल्यावर असे चिन्ह निर्माण होते. तेव्हा त्यांचे भाग्य उदयास येते त्यानंतर ज्या लोकांच्या हातावर मंदिरासारखे चिन्ह बनते ते नेहमी समाजात मान-सन्मान व कीर्ती मिळवतात. असे लोक बसतात एका जागी पण माहिती त्यांना सगळ्या आजूबाजूच्या लोकांची असते. म्हणून कोणी अडी अडचणीतअसेल तर सल्ला मागायला याच लोकांकडे येतात.

कारण हे लोक बुद्धिमान असतातच पण त्याव्यतिरिक्त ते चांगले मार्गदर्शक देखील असतात. त्याच बरोबर चरित्रवान व धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांच्या हाताच्या पंजावर ध्वजाचे चिन्ह असते. स्वस्तिक हे चिन्ह सुद्धा शुभ मानले जाते. ते दयाळूपणा सात्विकपणा याचे प्रतिक आहे.

ज्या लोकांच्या हातावर भाला किंवा त्रिशूलासारखे चिन्ह असते असे चिन्ह बहादुर असलेल्या माणसाच्या हातावर आढळते. पुढे पाहूयात पंजावर आढळणाऱ्या पर्वतांची चिन्हे. पहिले म्हणजे आपल्या कुंडलीत ज्या ग्रहाची स्थिती मजबूत व शुभ असते त्या ग्रहाच्या पर्वताची उंची जास्त असते.

त्या पर्वतावर काही शुभचिन्ह तयार होतात त्या बोटाची उंची बाकीच्या बोटांपेक्षा जास्त असते. जर एखाद्या व्यक्तीचे अनामिका बोट मोठा असेल तर त्या व्यक्तीची रवी पर्वत उंची जास्त असते व त्यावर शुभ चिन्ह असेल असा व्यक्ती प्रसिद्ध व गुणवान असतो.

दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीच्या हाताच्या पंजावर शनी पर्वताची उंची जास्त असेल ते अनुशासन प्रिय आणि यथार्थवादी असतात. जर गुरू पर्वताची उंची जास्त असेल तर त्या व्यक्ती राजनीति, नोकरी, व्यवसायामध्ये सफल होतात. जर शुक्र पर्वताची उंची जास्त असेल तर अशी व्यक्ती संगीत किंवा कलाक्षेत्रात उन्नती प्राप्त करतात.

बुध प्रभावाची व्यक्ती बौद्धिक क्षेत्रात प्रगती करतात. मंगल प्रभावाच्या प्रशासनिक सेवेत जातात. आता पाहुयात आपल्या नखांवरील अर्धचंद्राचा अर्थ. नखावरील अर्धचंद्राकृती शुभ असते. आनामिकेवर जर अर्धचंद्र असेल तर अशा व्यक्तींना मान-सन्मान मिळतो. तसेच अशा व्यक्तींच्या जीवनात धनवृद्धी होते. भाग्य बलवान असते.

ज्या लोकांच्या मध्यमा बोटावर अर्धचंद्र असतो ते व्यापारात उत्तम प्रगती करतात हे गुण शनिदेवाचे मानले जाते. ज्या लोकांच्या कोणताही नखांवर असे आकार नसतात त्या व्यक्ती रागीट असतात. त्याचबरोबर ते बुद्धिमान असतात अशा व्यक्तींना प्रत्येक बाबतीत सफलता मिळते.

आता पाहूयात जर आपल्या हातावरील रेखांमध्ये अर्धचंद्र बनत असेल तर याच अर्थ काय होतो. त्याचे रहस्य काय आहे? जर आपण दोन्ही जुळले आणि जर त्यामध्ये अर्धचंद्र बघत असेल तर अशी व्यक्ती आकर्षित स्वभावाची असते. असे लोक जीवनामध्ये आपल्या लहानपणीचे मित्र किंवा अशा परदेशात राहणारे व्यक्तीसोबत सेटल होतात. तसेच हे व्यक्ती खूपच हुशार असतात आणि प्रत्येक काम चांगल्याप्रकारे करतात.

कोणत्याही संकटांना न घाबरता सामोरे जातात. अशा व्यक्ती फार आकर्षित स्वभावाच्या असतात. अशा व्यक्ती बालपणीचा मित्र मैत्रिणीशी अथवा परदेशात राहणाऱ्या व्यक्तीसोबत सेटल होतात. या व्यक्ती जाहीरपणे आपले प्रेम व्यक्त करू शकत नाहीत. अशा व्यक्ती हुशार असतात. कठीण काळातही खंबीरपणे सामना करतात आणि लीडरपणे कोणत्याही कामाचे नेतृत्व करतात.

आता पाहुयात जर आपले हात जुळवल्यानंतर हातावरती अर्धचंद्र नाही बनला तर ती व्यक्ती कशी असते. जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर चंद्रकार बनत नसेल तर ती व्यक्ती खूपच शांत व दयाळू असते. अशा लोकांना आरामात काम करायला आवडतं. माणूस म्हणून ते खूपच चांगले असतात आणि जर तुमच्या हातावरती हात जुळवल्यानंतर सरळ रेष बनत असेल तर अशा व्यक्ती खूपच शांत व दयाळू असतात.

पण अशा प्रकारची सरळ रेषा बनणारे लोक खूप कमी असतात. आता पाहुयात असे लोक त्यांच्या हातावरील हस्तरेषा जुळतच नाही. म्हणजेच वरती किंवा खाली होते किंवा वाकडी तिकडी असते. अशी हस्तरेखा असणारे लोक दुसऱ्यांचा विचार करत नाही. लोक माझ्याबद्दल काय विचार करतात या गोष्टीने अशा लोकांना कोणताच फरक पडत नाही. अशाप्रकारे सामुद्रिक शास्त्रामध्ये हातावरील विविध चिन्हांचा अर्थ सांगण्यात आला आहे.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *