नमस्कार मित्रांनो,
आजच्या सध्या स्थितीत सगळीकडे स्पर्धा चालू आहे. एकाने एक व्यवसाय चालू केला व तो चांगला चालू लागला तर लगेच दुसरी व्यक्ती तोच व्यवसाय सुरु करतो. यामुळे पहिल्याच्या व्यवसायावर लगेच परिणाम होतो व दोघांमध्ये स्पर्धा सुरू होते आणि दोघांच्या भांडणात ग्राहकांचा फायदा होतो. आपल्या दुकानाची प्रगती व्हावी, आपल्या उ त्प न्ना त वाढ व्हावी यासाठी तुम्हाला मी काही उपाय सांगणार आहे.
हे उपाय दक्षिण भारतात केले जातात व खूप परिणामकारक उपाय आहेत. त्यासाठी एक तुरटी चा तुकडा घ्यावा. तो मोजून सव्वा पावशेर घ्यावा पण एकच मोठा तुकडा असावा एका काळ्या कापडात तो तुकडा बांधावा व ती गाठोडी दुकानाच्या आतील बाजूस इतरांच्या नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी बांधावे. हा उपाय बुधवारी किंवा शनिवारी करावा.
आणि सुर्योदयाआधी किंवा सूर्यास्तानंतर अंधारात हा उपाय करायचा आहे. दिवसा हा उपाय करू नये. हा तुकडा तसाच राहू द्यावा. शनिवारी किंवा बुधवारी अमावस्या आल्यास त्यादिवशी हा तुकडा उचलून नदीत टाकावा व त्या ठिकाणी पुन्हा अशाच प्रकारे दुसरा तुरटीचा तुकडा सव्वा पावशेर घेऊन काळ्या कापडात बांधून टांगून द्यावा.
तसेच दुकानातील मंदिरात भगवंतांना रोज ताजी फुले अर्पण करावीत व दुसऱ्या दिवशी ती फुले उचलून एखाद्या कुंडीत टाकून द्यावी किंवा नदीत प्रवाहित करावे. दुकानात प्रवेश करताना आधी उजवा पाय हात टाकावा मग दुकानात जावे आणि आधी देवाला फुले अ र्प ण करावेत. अगरबत्ती ओवाळावी नंतरच ग्राहकाशी व्यवहार करावा. आता आपण दुसरा उपाय बघू या हा उपाय अगदी साधा व सोपा आहे.
शिवाय यात फक्त आपल्याला एकाच वस्तूची गरज पडणार आहे. हा उपाय केल्याने फक्त 24 तासात तुम्हाला तुमच्या व्यवसायात वाढ झालेली दिसून येईल. फक्त त्यांचा व्यवसाय बंद पडला आहे किंवा कमी झाला आहे त्यांनीच हा उपाय न करता ज्यांना व्यवसाय आपला वाढवायचा असेल त्या सर्वांनी हा उपाय नक्की करावा.
आपल्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये ज्या इतरांशी संपर्क करण्याच्या वस्तू जसे टेलिफोन, मोबाईल, कॉम्प्युटर इत्यादी वस्तू असतील ज्याद्वारे आपण ग्राहकांची कनेक्टेड राहतो व नेहमी संपर्कात असतो अशा वस्तू नेहमी दुकानाच्या किंवा ऑफिसच्या वायव्य दिशेला म्हणजेच पश्चिम दिशा व उत्तर दिशा ज्या कोपऱ्यात एकत्र येतात त्या कोपऱ्यात ठेवाव्यात.
आपल्या व्यवसायासाठी किंवा ऑफिसला घराबाहेर पडण्यापूर्वी घरातील झाडूला एकदा न म स्का र करावा मगच घराबाहेर पडावे. कारण आपण मानत नसलो तरीही आपल्या धर्मग्रंथांमध्ये झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. जेव्हा आपण झाडूला नमस्कार करतो तेव्हा सा क्षा त देवी लक्ष्मीला न म स्का र करतो. यामुळे आपला व्यवसाय नक्कीच वाढेल त्याशिवाय शनिवारी किंवा अमावस्या च्या दिवशी एक लिंबू घ्यावे. लिंबू अगदी स्वच्छ व डाग विरहित म्हणजेच त्यावर कोणत्याही प्रकारचा डाग किंवा रेषा नसावे.
लिंबू ताजे व रसभरहीत असावे. त्या लिंबूवर काळ्या स्केचपेनने किंवा काळ्या मार्करणे मोठ्या अक्षरात 370 हा आकडा काढावा. मग दुकानाच्या किंवा ऑफिसच्या मुख्य दाराजवळ जाऊन डाव्या बाजूच्या भिंतीला लिंबूचा स्पर्श करीत करीत पुढे जावे व संपूर्ण दुकानाला आतून त्या लिंबाचा स्पर्श करीत करीत परत दुकानाच्या मुख्य दरवाज्याजवळ उजवीकडील भिंतीकडून बाहेर पडावे.
हा उपाय करताना लिंबू उचलू नये. तो दुकानाला स्पर्श करीत करीतच बाहेर काढावा. आधीच बाहेर एक सुई काढून ठेवावी व लगेचंच त्या लिंबाचे मधोमध 4 भाग करावे. परंतु वरूनच 4 भाग करावे व खाली ते चारही भाग जोडलेले असावेत. अशाप्रकारे तो लिंबू कापावा व लगेचच 4 रस्त्यावर नेऊन ते लिंबू टाकून द्यावे.
लिंबू टाकायला जाताना व येताना रस्त्याने कोणाशीही काहीही बोलू नये. परत येताना मागे वळून पाहू नये या उपायाने जर तुमच्या धंद्याला कोणाची नजर लागली असेल, ग्राहक येऊन काहीही न घेता परत जात असतील सर्व माल असूनही ग्राहक जर दुकानाकडे फिरकत नसतील तर हे सर्व निघून जाईल. तुमच्या ग्राहकांमध्ये वाढ होईल व पर्यायाने उ त्प न्ना त वाढ होईल.
व्यवसाय व्य व स्थि त चालू लागला की, वरच्यावर हा उपाय एखाद्या शनिवारी करीत रहावे. यामुळे आपल्या धंद्याला कोणाची वाईट नजर लागणार नाही व ऑफिसचे काम ही वेगाने होईल. हे उपाय करा व आपल्या व्यवसायात प्रगती करून आपल्या उत्पन्नात वाढ करा.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.