श्री स्वामी समर्थ, जर आपल्या काही अपूर्ण इच्छा असल्यास तसेच तुम्हाला काही अडचण असेल किंवा आपले कामात सतत अडथळा निर्माण होत असेल आणि ते महत्वाचे काम निर्विघ्न पूर्ण करायचे असेल. आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ याचा 1 अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. ह्या मंत्राचा किंवा उपायाने तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा, तसेच कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल.
कारण अक्कलकोट निवासी, ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेऊन करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा, मुर्तीची स्थापना करू शकतो आणि मनोभावे पूजा करू शकतो. त्यामुळे प्रत्येक संकटापासून तसेच तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणींपासून स्वामी तुमचे रक्षण करतील.
श्री स्वामींची कृपा आपल्यावर होईल आणि कोणत्याही गोष्टीची कमी तुमच्याकडे किंवा तुमच्या परिवारात राहणार नाहीत. याशिवाय घरात धन येण्याचे नवीन मार्ग निर्माण होण्यास सुरुवात होईल. गरिबी आणि दारिद्र्यता दूर होवून, घरात माता लक्ष्मी वास करेल. आज आम्ही तुम्हाला स्वामी समर्थांची एक सुंदर स्वामी प्रार्थना सांगणार आहे.
ही प्रार्थना स्वामींसमोर एकदा नक्की बोला. तुमच्या भावना स्वामीं पर्यंत नक्की पोहोचतील. तर ही स्वामींची प्रार्थना काही अशी आहे, “हे स्वामीराया जेव्हा आम्हाला प्रापंचिक अडचणी येतात, तेव्हा आम्ही तुला प्रार्थना करतो. त्यानंतर तू आम्हाला लगेच कर्म संकेत देतो आणि आमच्या शरीराकडून तुझ्या कर्म संकेताप्रमाणे कार्य सोडून सुद्धा होते.
पण हेच स्वामी समर्थ हे सुरू असताना कधीकधी मन खचून जाते, म्हणून हे श्रीगुरुदत्तात्रय सर्वप्रथम माझ्या प्रत्येक कर्मात अतूट अभंग विश्वासाची शक्ती दे. या शक्तीने तुझ्या प्रत्येक आज्ञेचे पालन होईल आणि माझ्या प्रार्थनेचे फळ देण्याचे ठरवले आहे ते मला नक्की भेटेल. हे आई मला माहीत आहे की, माझ्याकडून प्रार्थना करून घेणारा सुद्धा तूच आहेस.
त्यात त्याचे फळ देणारा सुद्धा तूच आहेस आणि आल्यानंतर आनंदी होणारा पण तूच आहेस. कारण या ब्रह्मांडात फक्त तूच आहेस मी कुठेच नाही आणि तूच आहेस. हे स्वामी समर्थ तुला कोटी कोटी धन्यवाद, तुला कोटी कोटी धन्यवाद.. श्री स्वामी समर्थ.. तर स्वामी महाराजची सुंदर स्वामी प्रार्थना तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा..
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.