सकाळी उठल्यावर पाणी भरपूर का प्यावे,

आरोग्य

नमस्कार मंडळी,

सकाळी उठल्यानंतर कमीत कमीत एक ग्लास साधारण कोमट पाणी रिकाम्या पोटी प्यावे कारण त्यामुळे रात्री झालेले डिहायड्रेशन भरून निघते. आपण रात्री पाणी पित नाही. झोपेतले सात-आठ तास आपल्या शरीराला पाणी मिळालेले नसते.

ती पाण्याची कसर सकाळच्या उपाशी पोटी पिलेल्या पाण्याने भरून निघते. सकाळच्या पाण्यामुळे पचन सुधारते. ते पाणी रक्तातील अशुध्द घटक वेगळे करते आणि रक्त शुध्दीकरण करते.

एवढेच करून हे पाणी थांबत नाही तर ते नवीन रक्तपेशी निर्माण करते. नवीन स्नायूंची निर्मितीसुध्दा करते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वजन घटवण्यास ते उपयोगी पडते. असे सकाळचे पाणी पिल्यानंतर काही क्षण तर काही खाऊ नये.

या पाण्याच्या उपायाचे कसलेही दुष्परिणाम होत नाहीत. तज्ञांच्या मते असे चार ग्लास पाणी प्यावे परंतु तेवढे जमत नसल्यास निदान एक ग्लास तरी प्यावाच हे प्रमाण वाढवत वाढवत चारापर्यंत न्यावे.

पाणी पिण्याच्या बाबतीत अनेक प्रकारचे नियम सांगितले जातात. भरपूर पाणी पिल्याने त्वचा चमकदार होते, अन्नपचन होते असे तर सांगितले जातेच पण आजकाल तेवढेच न सांगता इतरही काही बाबी सांगितल्या जायला लागल्या आहेत. त्यातली पाहिली म्हणजे पाणी शक्यतो कोमट असेल तर प्यावे फार थंड पाणी पिऊ नये.

सकाळी भरपूर पाणी प्यावे आणि संध्याकाळी कमी पाणी प्यावे. जसजशी रात्र होईल तसतसे पाण्याचे प्रमाण कमी करत न्यावे. वगैरे वगैरे नवे नियम आता पुढे येत आहेत. त्यातील सकाळी पाणी का प्यावे याची कारणमीमांसा सांगितली जाते ती खालीलप्रमाणे आहे.

टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंगमराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *