मित्रांनो, प्रत्येकाला आपली प्रगती व्हावी तसेच आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत आपण आपले जीवन हे आनंदाने जगावे असे मनोमन वाटतच असते आणि त्यासाठी आपण मेहनत कष्ट हे घेतच असतो. परंतु आपल्या आसपास अशी काही माणसे असतात ती आपल्याला विनाकारण त्रास देत असतात.
म्हणजेच ही माणसे आपल्या कामांमध्ये काही ना काही अडचणी, अडथळे निर्माण करतात. तसेच आपली निंदा देखील करण्यात ते मागे पडत नाहीत.अशा माणसांच्या त्रासामुळे आपल्या कामांमध्ये आपले लक्ष राहत नाही. आपण सतत त्यांचा विचार करत राहतो आणि त्यामुळे मग आपल्याला कामांमध्ये अपयश प्राप्त होते आणि आपली प्रगती खुंटते आणि त्यामुळे मग आपल्याला अनेक अडीअडचणींचा सामना हा करावाच लागतो.
म्हणजेच एक प्रकारची शत्रू पिडा आपल्या पाठीमागे असते. म्हणजेच त्यांना आपले कधी चांगले होऊ नये असे वाटत असते आणि त्यामुळे ते सतत आपल्या कामांमध्ये अडथळे हे निर्माण करतच राहतात व त्यामुळे आपली अजिबातच प्रगती होत नाही. तर मित्रांनो तुम्हाला देखील कोणीही विनाकारण जर त्रास देत असेल तर मी आज या शत्रूपिडे वरती एक उपाय सांगणार आहे.
हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमची शत्रू पिडा निघून नक्कीच जाईल. जे आपले शत्रू आहेत म्हणजेच त्यांना आपले चांगले झालेले अजिबात बघवत नाही आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतात आपल्याबद्दल वाईट साईट बोलतात यापासून आपली सुटका नक्कीच होणार आहे. तर हा उपाय नेमका कोणता आहे जाणून घेऊया.
तर या उपायासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे आणि हा नारळ आपण आपल्या तळहातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या घरातील देवघरासमोर बसायचे आहे. आपले दोन्ही डोळे बंद करून आपण स्वामींना प्रार्थना करायची आहे कि, विनाकारण मला जे कोणी त्रास देतात तो त्रास माझा कमी होऊ दे. जे काही शत्रू आहेत ही शत्रुपीडा नष्ट होऊ दे. माझी प्रगती होऊ दे. अशी प्रार्थना करून स्वामींना नमस्कार करायचा आहे.
जो आपण हातात घेतलेला नारळ आहे हा नारळ आपल्याला तसाच देवघरामध्ये ठेवायचा आहे. तुम्ही सकाळ संध्याकाळ कधीही हा उपाय करू शकता. म्हणजे तुम्हाला सकाळी जमेल तर तुम्ही सकाळी करायचा आहे आणि सकाळी हा उपाय केल्यानंतर हा नारळ तुम्हाला संध्याकाळपर्यंत तसाच देवघरामध्ये ठेवायचा आहे.
जर संध्याकाळी हा उपाय केला तर रात्रभर तो नारळ तुम्हाला देवघरांमध्ये तसाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी उठल्यावर स्नान करून झाल्यानंतर तो नारळ आपणाला पाण्यामध्ये समर्पित करायचा आहे. म्हणजेच तो नारळ त्या पाण्यामध्ये वाहून द्यायचा आहे. जर तुमच्या आजूबाजूला कोणती विहीर असेल, तलाव असेल तर अशा ठिकाणी तो नारळ तुम्ही विसर्जित केला तरीही चालतो.
जर आजूबाजूला विहीर, तलाव नसेल तर तुम्ही तो नारळ एखाद्या मोठ्या झाडाच्या मुळाशी ठेवायचा आहे किंवा तो मंदिरात देखील तुम्ही ठेवून दिला तरीही चालेल. तर मित्रांनो असा हा चमत्कारिक जर उपाय तुम्ही केला तर यामुळे तुमची शत्रू पिडा नक्कीच नष्ट होईल.
म्हणजेच जे तुमचे काही वाईट साधत असतील म्हणजेच तुमच्याबद्दल वाईट बोलणे किंवा तुमच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणारे जे लोक आहेत म्हणजे तुमचे जे शत्रू आहेत यांच्यापासून जर तुम्हाला सुटका हवी असेल तर हा प्रभावशाली चमत्कारिक असा उपाय तुम्ही अवश्य करून पहा. यामुळे तुम्हाला विनाकारण जे त्रास देत आहेत या त्रासापासून तुमची सुटका होईल आणि तुमची प्रगती नक्कीच होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.