तुमच्याही मनासारखे होत नसेल तर यावर काय करावे? स्वामी महाराज उपदेश…

माहिती राशिभविष्य

श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराजांच्यावर असंख्य सेवेकरांची श्री स्वामींवर अपार श्रद्धा आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे. कारण पूर्ण अंतकरणाने आणि निस्वार्थीपणे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्यास,आपल्यातील नकारात्मकता दूर होण्यास सुरुवात होते. त्यामुळेच श्री स्वामींची सेवा केली जाते.

कारण स्वामीभक्त दूख: भिती, चिंता घालवण्यासाठी स्वामींच्या पुढे नतमस्तक होतात. त्याचबरोबर आपण आपल्या निरोगी आरोग्यासाठी स्वामींची ही विशेष सेवा करू शकतो. मात्र काही वेळा काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, त्यावेळी स्वामींनी दिलेला हा उपदेश नक्कीच आचरणात आणला पाहिजे..

जीवनामध्ये आपल्याला खूप गोष्टी आपल्या मनासारख्या हवे असतात. आपल्याला खूप काही हवं असतं पण मिळत नाही. काही गोष्टी आपल्या मनासारखं होत नाही, मग त्या वेळेस आपण स्वतःला दोष देतो किंवा स्वामींना दोष देत राहतो. पण त्यावेळेस आपण आपल्या जीवनाला दोषी ठरवत असतो. मात्र यावर स्वामी महाराज म्हणतात कि, तुला हवे तसे घडत नसेल तर परमेश्वराचे आभार मान.

कारण तुझा नाही तर देवांच्या पद्धतीने ते घडत आहेत म्हणून जर काही वेळा काही गोष्टीचा तुझ्या मनासारख्या घडत नसतील तर त्यावेळेस तू विचार कर आणि लक्षात ठेव की, त्या गोष्टी देवाच्या इच्छेनुसार आणि देवाच्या मनानुसार घडत आहेत. तुझ्या जीवनाला आकार निश्चित मिळणार आणि तुला जे हवं ते नक्की मिळणार.

कारण स्वामी म्हणतात की, माठाला किंमत तेव्हाच जेव्हा कुंभार त्याला घडवतो. तसेच त्याचबरोबर आपल्याजीवनाचा कुंभार स्वामी आहेत. त्यामुळे आपण एक गोष्ट इथे लक्षात ठेवायला पाहिजे की, आपल्या आयुष्याची कुंभार आपले स्वामी तेच आपल्याला घडवत आहेत आणि तेच आपल्याला घडवतील.

म्हणून जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही तेव्हा आपण कोणालाही दोष देऊ नये किंवा स्वतःलाही दोष देऊ नका. कारण त्या गोष्टी या पूर्णपणे स्वामीं महाराजच्या मनानुसार किंवा म्हणण्यानुसार आणि स्वामींच्या मर्जीने होत आहेत म्हणून जे होतंय. कारण आपल्या सर्वांच्या जीवनात कधी न कधी सुख-दुःखे, अडचणी समस्या चांगले दिवस येतच असतात.

तसेच वाईट दिवस तरी येतच असतात. जसे तुम्ही चांगल्या दिवसात हसत खेळत राहता तसेच दुःखात अडचणीमध्ये सुद्धा स्वतःला सावरत राहा. दुःखात तुम्ही देवाचे नाव घ्यावे. तसेच सुखाचा देवाचे नाव घेतला आणि मनासारख्या गोष्टी घडत नसतील तर घाबरू नका, टेन्शन घेऊ नका तुमच्या मनासारखा होईल..

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *