रोज सकाळी तुळशीला पाणी अर्पण करत असताना बोला हा एक मंत्र!

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो, आपल्या घरातील गरिबी दूर व्हावे आणि त्याचबरोबर घरातील धनसंपत्ती वाढावी आणि आपल्या घरातील लक्ष्मी माता घरांमध्ये स्थिर व्हावी यासाठी आपल्यातील बरेच जण दिवसरात्र मेहनत घेत असतात. त्याचबरोबर लक्ष्मीमातेची अगदी मनापासून पूजा-अर्चा देखील करत असतात. या सर्व गोष्टी करत असतानाच आपल्यातील बरेच जण शास्त्राची मदत घेऊन वेगवेगळे उपाय घरांमध्ये करून घरातील गरिबी दूर करण्याचा आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचा ही प्रयत्न करत असतात.

मित्रांनो आज आपण तुळशी संबंधित उपाय पाहणार आहोत. आपल्या प्रत्येकाच्या दारामध्ये तुळशीचे एक कधीतरी व ते असतेच आणि त्याचा उपयोग करून आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायचा आहे याबद्दलच आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व दिले गेले आहे आणि त्याचबरोबर वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक दृष्ट्या ही तुळस तितकीच महत्त्वाची आहे. म्हणूनच तुळशीचा उपयोग करून आपण अनेक समस्यांवर त्याचबरोबर रोगांवर मात करू शकतो.

आपल्या शास्त्रांमध्ये तुळशी संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत त्यामधील याच काही प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो ज्या ठिकाणी तो असते याठिकाणी सकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळेच तुळशी ज्या लोकांच्या घरामध्ये आहेत त्यांना त्याचा खूप मोठा फायदा होत असतो. आज आपण जो तुळशीचा उपाय पाहणार आहोत यामध्ये आपल्याला जेवढी आपल्या घरातील एखादी स्त्री किंवा कोणतीही व्यक्ती तुळशी मातेला सकाळच्या वेळी पूजा केल्यानंतर पाणी अर्पित करत असतात. त्यावेळी आपल्याला एका प्रभावी मंत्राचा जप तुळशी माते समोर उभे राहून करायचा आहे.

रोज सकाळी उठून स्नान केल्यानंतर तुळशीला तांब्या मधून पाणी अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर तुळशी मातेला पाणी अर्पण करत असताना आपल्याला ओम तुलसी प्रियाय नमः, ओम तुलसी प्रियाय नमः या मंत्राचा जप ११ वेळा करायचा आहे. मित्रांनो हा मंत्र घरातील कोणत्याही व्यक्तीने तुळशीला देव पूजेनंतर पाणी घालत असताना केला तरीही चालेल. परंतु शक्यतो घरातील विवाहित स्त्रीने या मंत्राचा जप तुळशी मातेला पाणी अर्पण करत असताना म्हणायच आहे. यामुळे या मंत्राचा चांगला परिणाम दिसून येईल.

त्याचबरोबर या मंत्राचा जप करत असताना तुळशीला तुम्हाला जितक्या शक्य होइल तितक्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. यामुळे तुळशीमध्ये असणारे सकारात्मकता त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रवेश करते. त्याचबरोबर या मंत्राचा जप जर विवाहित स्त्रीने केला तरी यामुळे त्या स्त्री च्या घरावर माता लक्ष्मीची कृपा अखंड राहील आणि त्यामुळे घरातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतील आणि घरातील संपत्तीत वाढ होत जाईल.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *