नमस्कार मित्रांनो,
तवा आपल्या किचनचा एक अविभाज्य भाग आहे. जर तवा नसता तर आपण भाकरी किंवा पोळी बनू शकलो नसतो. आज मी तुम्हाला तव्याच्या बाबतीत अशा काही बाबी सांगणार आहे ज्या तुम्हाला अजूनपर्यंत कोणीही सांगितले नसतील.
वास्तु शास्त्रानुसार किचन मधील तव्याचे काय म ह त्त्व आहे हे आज तुम्हाला सांगणार आहे. आपल्यापैकी कितीतरी जणांना हे माहित नसेल कि तवा किंवा कढई राहूचे प्र ति नि धि त्व करतात. हे आपले नशीब बिघडू शकतात आणि आपल्याला अधोगतीकडे नेऊ शकतात.
हिंदू धर्मानुसार तवा कधीही पालथा ठेवू नये.घरात ज्यावेळी कोणाचा मृत्यू होतो त्यावेळी तवा पालथा टाकतात. म्हणजेच घरात स्वयंपाक बनवला जाणार नाही असा याचा अर्थ होतो.
म्हणजेच घरातील कोणी सदस्य मृत्यू झाल्यास तव्याचा वापर बंद केलेला आहे.
हे दर्शविण्यासाठी तवा पालथा टाकला जातो आणि जर कोणी व्यक्ती घरात मुद्दाम तवा पालथा टाकत असते तर हे एक अशुभतेचे लक्षण आहे. म्हणून चुकूनही कधीही तवा पालथा ठेवू नये. खूप वर्षांपर्यंत एकच तवा वापरू नये. कारण दिवसेंदिवस त्याच्यावर तेलाचा थर जमा होत जातो व घासूनही हा थर निघत नाही.
काही घरांमध्ये अगदी तेलाचे थर बसून काळेकुट्ट झालेले तवे असतात आणि त्याच्यावरच पोळ्या किंवा भाकरी केल्या जातात. परंतु हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. जेव्हा आपण त्याच तव्यावर स्वयंपाक करतो त्यावेळी त्या थराचे काही अंश आपल्या स्वयंपाकात उतरतात. आणि त्यामुळे आपल्याला किंवा आपल्या परिवारातील सदस्यांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते.
हे अन्न दूषित होते व तेच दूषित अन्न आपण खातो. खूप काळापर्यंत जर आपण फुटलेल्या किंवा तडा गेलेल्या तव्यावर स्वयंपाक केला तर आपल्याला दोष लागतो व आपण कधीही धनवान होऊ शकत नाही. आपण दरिद्रीच राहतो किंवा हळूहळू दारिद्र येण्यास सुरुवात होते.
तवा आणि कढई यांचे काम झाले की, लगेचच स्वच्छ करून जागेवर ठेवावेत. गरम गरम तव्यावर कधीही पाणी टाकु नये.
यामुळे घरात भांडण तंटे आणि वादविवाद होतात व घरात नेहमी कोणी ना कोणी आजारी पडते.
म्हणून तवा थंड झाला की, नंतर त्याच्यावर पाणी टाकावे. तवा व कढई नेहमी स्वच्छच असावेत नाही तर दोष लागतात. स्वयंपाक करताना ज्या वेळी आपण पहिली पोळी तव्यावर टाकतो त्यापूर्वी तव्यावर थोडेसे दूध शिंपडावे व त्यानंतर पोळ्या किंवा भाकरी करण्यात सुरुवात करावी.
यामुळे आपल्या कर्जापासून आपली मुक्तता होते. घरात बनवलेल्या पोळ्यांमध्ये सर्वात पहिली पोळी थोडेसे साजूक तूप लावून गाईला खाऊ घालावी. कारण गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो.
गाईला आपल्या स्वयंपाकातील पहिली पोळी खायला दिली तर आपल्यावर सर्व देवी-देवतांची कृपा होते व आपल्याला धनाची कमी कधीही जाणवत नाही. आणि आपल्यावर देवी अन्नपूर्णेचा सदा आशीर्वाद राहून आपले घर सदा धनधान्याने भरलेले राहते.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.