स्वामी समर्थांना आवडतात या पाच गोष्टी. जो भक्त पाळतो ह्या गोष्टी त्याला स्वामी भेट होते लवकर

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

तुमचे स्वागत आहे. स्वामी समर्थ महाराज यांना या पाच गोष्टी मनापासून आवडतात आणि जो भक्त या पाच गोष्टी आचरणात आणतो. तर स्वामी त्याला लवकर भेट देतात. ते संकट त्याचे हरतात. सगळ्या इच्छा त्याच्या पूर्ण करतात. तर या सर्व गोष्टी तुम्ही आचरणात आणा!! स्वामींची भेट होईल. लवकरात लवकर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तर त्या पाच गोष्टी ह्या आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे स्वामींची सगुण उपासना, मनापासून मनोभावे, पूर्ण श्रद्धेने स्वामींची उपासना करणे ही एक गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे. अशा सगुण उपासनेला आणि या सेवेला, स्वामी नक्कीच प्रसन्न होऊन भक्तांची सगळी इच्छा पूर्ण करतात. तर मित्रांनो तुम्ही स्वामींची मनापासून मनोभावे सगुण उपासना करा. त्यांची मनापासून सेवा करा. स्वामी नक्कीच तुम्हाला दर्शन देतील.

मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे, अन्नदान, अन्नदान करणे म्हणजेच सगळ्यात मोठे पुण्याचे काम आहे. हे सगळ्यांना माहीत आहे. लोक अन्नदान करतात परंतु ते कोणत्या तरी खास दिवशी सणासुदीला अन्नदान करतात. त्यांचे त्यांना फळ मिळावे. पण हे अत्यंत चुकीचे आहे. अन्नदान गरीब व्यक्तीला रोज करायला हवें. निदान एक चपाती एक भाकरी जे असेल ते आपण एका गरिबाला देउच शकतो.

मागणारा कुणी गरीब आला तर त्याला नक्कीच अन्नदान करा. ही गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे. मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींचे नामस्मरण! सगळ्यांना माहीत आहे की स्वामी समर्थ नामात या मंत्रात किती चमत्कारी शक्ती आहे. या नावाचे मनोभावे नामस्मरण केले तर स्वामी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांचे सगळे संकट हरतात आणि सगळ्या इच्छा पूर्ण करतात.

मित्रांनो चौथी गोष्ट म्हणजे; माणूस जोडण्याची हौस असणे म्हणजेच लोकप्रियता, प्रत्येक माणसासोबत, प्रेमाने बोलणे, त्यांचा आदर करणे!! सगळ्यांना प्रेम करणे कोणाचाही तिरस्कार न करणे, या गोष्टी जो पण व्यक्ती पाळतो. त्यांच्यावर स्वामी नक्कीच प्रसन्न होतात. मित्रांनो पाचवी गोष्ट आहे. आपली जी ही परिस्थिती असेल त्यात समाधान मानायचे. म्हणजे आपल्याला मिळाले. त्यात आनंदात राहायचे.

जास्त मागायचे नाही. जे आहे त्यावर रडायचे नाही. जे दिलेले आहे ते देवाने दिलेले आहे आणि आपण त्यातच आनंदी राहून आपले जीवन जगायचे! तर मित्रांनो या पाच गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि आचरणात आणायच्या ह्या गोष्टी आचरणात आल्या की स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतातच आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. मग आपल्याला सगळे काही मिळते. हवे ते स्वामी आपल्याला देतात. तर मित्रांनो अगदी सोप्या गोष्टी आहेत. तर आपण या गोष्टी पाळायला हव्यात.

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डाशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *