सारखाच आळस येत असेल, कुठलेच काम पूजा नामस्मरण करू वाटत नसेल, झोप जास्त किंवा कमी येत असेल तर करा हा उपाय

अध्यात्मिक

मित्रानो, श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करताना आपल्याही डोळ्यात पाणी येत असेल तर जाणून घ्या त्यामागील रहस्य. काही वेळेला तुम्हाला जाणवले असेल की पूजा करताना डोळ्यात अश्रू येतात. शास्त्रानुसार बघितले तर पूजा करताना डोळ्यात अश्रू येणे, डोळे मिटल्यासारखे वाटणे, झोप येणे, जांभई येणे किंवा शिंका येणे हे एक मोठे रहस्य आहे.

आज मी तुम्हाला पूजेच्या वेळी नकळतपणे घडणाऱ्या या मजेदार गोष्टींबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया पूजा करताना का येत आपल्या डोळ्यात अश्रू? का येते जांभई? का वाटते आपल्याला झोप येते? का येते शिंक? तर मित्रानो हेच अश्रू आपली पूजा सफल झाल्याचे संकेत आहे. शास्त्रामध्ये लिहिले आहे की, सच्चा मनाने व भक्तिभावाने केलेली पूजा सदैव देव स्वीकार करतात. त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते.

पण जर कोणत्याही व्यक्तीला पूजा करताना जांभई किंवा झोप येत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती दोलाईमान अवस्थेत आहे व त्या व्यक्तीच्या मनात अनेक प्रकारचे विचार चालू आहेत. पूजेत त्याचे लक्ष नाही. विचारांची गुंतागुंत चालू आहे. ती मनाला शांतता मिळू देत नाही. जर तुम्ही काही संकटात आहात व त्यातून बाहेर पडण्यासाठी देवाची भक्ती करत आहात तर तुम्हाला जांभई किंवा झोप येऊ शकते.

देवाने आपल्याला काही संकेत देणे शास्त्रात व पुरानात असे सांगितले गेले आहे की, जर पूजा पाठ करताना तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले की तुम्हाला समजले पाहिजे की ईश्वरी शक्ती तुम्हाला काहीतरी संकेत देत आहेत. जर तुम्ही देवाच्या कोणत्याही रूपात ध्यानात व पूजेत मग्न झाला असाल, देवाला मनोभावी प्रार्थना करीत असाल तर त्याचा अर्थ असा की देवाच्या भक्तीत तुम्ही तल्लीन झाला आहात. आपण असेही म्हणू शकतो की तुम्ही केलेली त्याची पूजा सफल झाली आहे.

जे तुमच्या ख़ुशीमुळे अश्रूंच्या रूपात बाहेर येत आहे. भक्त हो महत्त्वाचे म्हणजे कधीही मनापासून केलेली गोष्ट ही नेहमीच यशस्वी होते. काही वेळेला असे बोलले जाते की पूजेच्या वेळेला येणारे डोळ्यातले अश्रू व जांभई येण्याचे एक कारण म्हणजे तुमच्यातली नकारात्मकता असू शकते.

जेव्हा केव्हा आपले मन पूजा पाठ धार्मिक ग्रंथ किंवा आरती करण्यामध्ये लागत नाही व शरीराला जडत्व वाटू लागते. तर तुम्हाला समजले पाहिजे की कोणीतरी नकारात्मक शक्ती किंवा ऊर्जा तुमच्या आसपास अस्तित्वात आहे व ती तुमच्या मनाची एकाग्रता होऊ देत नाही. तुमचे चित्त विचलित करीत आहे.

तर मित्रांनो तुम्ही कधीही देवाचे नामस्मरण, पूजा पाठ करीत असाल त्यावेळेस ही पूजा किंवा पाठ अगदी मनोभावे व श्रद्धेने करायचे आहे तरच ती देवापर्यंत पोहोचते.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *