संध्याकाळी ‘ही’ कामे केली तर दुर्भाग्य घरात येईल सगळे काही वाईट होईल !

अध्यात्मिक राशिभविष्य वास्तूशास्त्र

मित्रांनो आपल्या हिंदू शास्त्रानुसार असं म्हटलं जात की, सायंकाळच्या वेळेस काही विशेष कामे चुकूनही करू नका, यामुळे लक्ष्मी घरापासून दूर राहते. ही कामे तुम्ही संध्याकाळी केली नाहीत तर घरात देवदेवतांची कृपादृष्टी राहते.ही कामे जी संध्याकाळी करु नयेत. चला तर मग जाणून घेवू कोणती आहेत ती कामे.

तर मित्रांनो सर्वप्रथम, माता तुळशीजवळ दिवा लावा, मात्र संध्याकाळच्या वेळी चुकूनही तुळशीला पाणी घालू नका. दिवा लावल्याने घरात सुख-समृद्धि कायम राहते. मात्र संध्याकाळी तुळशीला पाणी घालू नये. याशिवाय, संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये झाडू मारायचा नाही. यामुळे घरातील सकारात्मक उर्जा बाहेर निघून जाते. घरात दारिद्र्यता येते.

म्हणूनच मित्रांनो संध्याकाळ होण्याआधी घर झाडून घ्या. दुसऱ्याबाबत वाईट बोलणे अथवा चुगली कऱण्याची सवय नेहमी वाईट असते. विशेषकरुन संध्याकाळच्या वेळेस कोणाबद्दलही वाईट बोलू नका. काहीजणांना लोकांची निंदा करण्याची सवय असते. मात्र यामुळे कोणतेही लाभ होत नाहीत उलट समाजात प्रतिमा कमी होते आणि संध्याकाळच्या वेळेस पती-पत्नींनी प्रेमसहवासापासून दूर राहावे.

संध्याकाळी घरातील वातावरण धार्मिक आणि पवित्र ठेवले पाहिजे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस पती-पत्नीने शरीरसंबंध ठेवू नये. संध्याकाळी म्हणजेच गोधुली वेळेच्या दरम्यान मुख्य प्रवेशद्वार काही काळासाठी उघडे ठेवावे. आणि मित्रांनो असे ही मानले जाते की, संध्याकाळी देवी लक्ष्मीचे आगमन होते, म्हणून पूजेच्या ठिकाणी दिवा लावताना संध्याकाळी घराचे मुख्य दरवाजे उघडावेत.

असे केल्याने देवी लक्ष्मीचा निवास तुमच्या घरात सदैव राहतो. याशिवाय, शुक्रवारीच्या दिवशी सायंकाळी कोणालाही कर्ज देऊ नका किंवा कोणाकडून घेऊ नका. असे केल्याने तुमच्या घरातील लोकांचे आरोग्य बिघडू शकते आणि या दिवशी एखादी व्यक्ती तुमच्याकडे मदतीसाठी विचारणा करत असेल तर नक्कीच मदत करा, परंतु ती कर्जाच्या रूपात नव्हे तर आर्थिक मदतीच्या स्वरूपात असावी.

शुक्रवारच्या दिवशी कर्ज देणे तुमची आर्थिक स्थिती कमकुवत करू शकते. शुक्रवारी सायंकाळी काही लोक वैभव लक्ष्मीचा उपवास करतात. या दिवशी कुमारिका जेवण असते आणि चुकूनही मुलींचा या दिवशी अनादर होऊ देऊ नका. म्हणजेच जर या दिवशी तुमच्या घरात एखादी मुलगी असेल तर तिला चिडवू नका किंवा फटकारु नका. त्याऐवजी तिला आदराने आवडीचे जेवण द्या.

या शिवाय घराच्या लक्ष्मीने म्हणजेच घरातील स्त्रियांनी शुक्रवारी कोणतेही अपमानजनक शब्द बोलू नयेत आणि सायंकाळच्या वेळी कोणालाही लक्ष्मी देवीची मूर्ती भेट देऊ नका. असे करणे चांगले मानले जात नाही. तसेच या वेळी तुम्ही लक्ष्मीची मूर्ती घरी आणू शकता परंतु ती कोणालाही भेट म्हणून देऊ नये.

शुक्रवारी संध्याकाळी विधिवत देवी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर तिला घरात येण्याचे आवाहन करावे. तसेच सायंकाळी वेळेस कधीही झोपू नये. हे स्वास्थ्यासाठी चांगले नाही. जे लोक नियमित संध्याकाळच्या वेळेस झोपतात ते लठ्ठपणाचे शिकार होतात. आजारी, वृद्ध अथवा गर्भवती स्त्रियांनी संध्याकाळी झोपल्यास चालते.

मात्र निरोगी लोकांनी संध्याकाळी झोपू नये त्यामुळे आळस वाढतो आणि ज्या घरातील लोक संध्याकाळी झोपतात त्यांच्या घरात लक्ष्मी वास करत नाही. संध्याकाळी कधीही जेवू नका. असे म्हटले जाते की संध्याकाळच्या वेळेस कधीही जेवू नये. यामुळे पोटाच्या समस्या वाढतात. अभ्यासाची योग्य वेळ सकाळी असते. संध्याकाळच्या वेळेस कधीही अभ्यासाला बसू नये.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *