रागीट व्यक्तीला हे खाऊ घाला स्वभाव शांत होईल

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

आपल्या घरात जर एखाद्या व्यक्तीला लहान-सहान गोष्टींवरून राग येत असेल, संताप होत असेल तर अशा रागीट स्वभावाच्या व्यक्तीला शांत करण्यासाठी शिवमहापुराण्त एक उपाय सांगितला आहे. हा उपाय कोणत्याही शिवरात्रीला आपण करू शकता. शिवरात्र ही प्रत्येक महिन्यात असते.

आपण कॅलेंडर मध्ये पंचांगामध्ये पाहू शकता. शिवरात्रीच्या रात्री हा छोटासा उपाय केल्याने रागीट व्यक्ती वारंवार छोट्या छोट्या गोष्टीवरून राग येणाऱ्या व्यक्ती वारंवार क्रोध देणारी संताप करणारी व्यक्ती शांत बनते. हा उपाय केवळ एकदाच करायचा आहे. उपाय करण्यासाठी पाच बेल पत्र म्हणजे पाच बेलाची पाने त्याचे जे देठ आहे ते तोडायचे आहे.

पाच बेल पत्राची पाच देठ तोंडुन जवळपास असणाऱ्या शिवमंदिरात जायचं आहे. जाताना आपल्या घरातील तांब्याभर पाणी घेऊन जाण्यास विसरू नका. आपण ते पाणी शिवलिंगाच्या खालच्या भागावर म्हणजे ज्या ठिकाणी आपण शिवलिंगावर अभिषेक करून पाणी ज्या ठिकाणी खाली येतं त्या ठिकाणावर ज्या ठिकाणावरून पाणी उधळून जातं,

अशा सर्वात खालच्या बाजूला हा जो भाग आहे तो भगवान श्री शिवशंकर यांची धाकटी कन्या तिचं नाव अशोक सुंदरी. अशोक सुंदरी चा हे जे स्थान आहे सर्वात शेवटी हे पाच देठ बेल पत्रा चे पाच देठ ठेवायचे आहेत. हे पाच देठं ठेवल्यानंतर हाटकेश्वर महादेवांचे नामस्मरण करायचा आहे.

हे हटकेश्वर महदेव कोणताही व्यक्ती जो हटयोगी आहे खूप हट्टी आहे. एखाद्या गोष्टीवर हट्टी होऊन बसतो एखाद्या गोष्टीला खूप ताणतो. जो हट्ट करतो अशा व्यक्तीला शांत करतात. तसं तर हाटकेश्वर महादेव याचं महात्म्य खूप मोठा आहे. हटकेश्वर महादेवांचा फक्त आपण नामस्मरण करायचा आहे.

आणि तांब्याभर घरून आणलेले पाणी शिवलिंगावर अर्पण करायचा आहे. पाणी अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि प्रार्थना करा की अमुक अमुक जी व्यक्ती आहे ती व्यक्ती शांत होऊ दे तिचा हट्टीपणा कमी होऊ दे. रागीट व्यक्ती स्वतः सुद्धा स्वतःसाठी हा उपाय करू शकते.

हे जल अर्पण केल्यानंतर अर्थातच हे जल अर्पण केल्यानंतर शिवलिंग वरून खाली वाहत वाहत. ज्या ठिकाणी अशोक सुंदरीच स्थान आहे. या ठिकाणावरून वाहत खाली येणार आहे या पाण्यासोबत या ज्या पाच देठ च्या कडया आहेत. हे जे पाच देठं आहेत त्यापैकी काही खाली सुद्धा पडतील.

जितके देठ खाली पडतील एक पडू दे दोन पडू दे जितके देठ खाली पडतील तितकें देठ आपण घ्यायचे आहेत आणि घरी परत यायचं आहे. ज्या व्यक्तीला राग येतो जी व्यक्ती व्यक्ती क्रोधी आहे जी व्यक्ती हट्टी आहे. संताप करते त्या व्यक्तीला आपण हे जे खाली पडलेले देठ आहे. ते देठ खाऊ घालायचे आहेत.

एक तर बारीक करून वाटून खाऊ घाला किंवा अगदी तसेच खाल्ले तरी चालतील. फक्त एक शिवरात्री हा उपाय करून पहा. भगवान शिवशंकर भोले नाथा यांची कृपेने हा जो रागीट स्वभाव आहे तो कमी होऊ लागेल. लक्षात ठेवा आला राग भीक माग ही म्हण अगदी प्रचलित आहे.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *