पूजेमध्ये अर्पण केलाला नारळ खराब निघणे शुभ की अशुभ..?

अध्यात्मिक राशिभविष्य

अनेकदा पूजेच्या वेळी अर्पण केलेले नारळ खराब निघाला जातो. मग अशा परिस्थितीत, बहुतेक लोक त्यास फेकून देतात आणि त्यांना भीती वाटते असते की, आपल्या सोबत काहीतरी अशुभ होईल, आपल्यावर देव क्रोधित आहे किंवा एखादा अपघात होणार आहे, बर्‍याच गोष्टी मनाच्या घर करत असतात.

हिंदू धर्मात नारळाशिवाय कोणतेही पूजा अपूर्ण समजली जाते, म्हणून प्रत्येक शुभ कार्यात नारळाचा वापर केला जातो. कारण हिंदु धर्मात नारळाला लक्ष्मी देवीचे हे प्रतीक मानतात. प्रत्येक पूजेचे नारळ असणे खूप आवश्यक आहे. यामुळे देवी प्रसन्न होते.तसेच तीर्थस्थानी गेल्यास, तिथे नारळ घेऊन फोडले जाते व भगवंतांना देऊन आपल्याही खोबर्‍याचा प्रसाद घेतला जातो.

याशिवाय आपल्या अनेक सणांमध्ये, तसेच नवरात्रातही प्रसाद म्हणून नारळ वाहिले जाते. तसेच गणपती मंदिरात, सर्व शक्तीस्वरूप देवीच्या देवळात नारळ फोडले जाते पण जर आपण नारळ फोडले आणि त्यातून खराब झाले तर, आपल्या मनात अनेक विचार निर्माण होतात. देवी देवता आपल्यावर नाराज झाले आहे, म्हणूनच नारळ खराब निघाले.

म्हणूनच शास्त्रामध्ये आपण पूजेमध्ये अर्पण केलेले नारळ जर खराब निघाला तर ते अशुभ मानले जात नाही. कारण पण जर आपला पूजेचा नारळ खराब निघाला, तर हे आपल्या बरोबर काहीतरी शुभ घडण्याचा संकेत समजला जातो. म्हणजेच पूजेचे नारळ खराब निघणे हे शुभ संकेत विषयी माहिती अनेक हिंदु ग्रंथामध्ये दिली आहे.

कारण अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनात खूप मोठा प्रभाव पडत असतात. त्यामुळे जेव्हा पूजेचे नारळ खराब निघाले तर, याचा अर्थ असा होतो की,देवाने आपला पुर्ण प्रसाद स्वतः खाल्ला आहे. म्हणूनच नारळ खराब निघते, म्हणजे दुसरे कोणीही ते खाऊ शकणार नाही. मग ते संपूर्ण नारळ भगवंतांना अर्पण करण्यात येतो.

त्याबरोबर या घटनेचा दुसरा अर्थ असाही होतो की, तुमची इच्छा, मनोकामना लवकरच पूर्ण होण्याची शक्यता असते. देवाच्या पूजेच्या वेळी तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होते, असा संकेत मिळतो. यापुढे जर तुमच्या पूजेचे नारळ खराब निघाले तर,तुम्ही आनंद माना कारण, देव आपल्यावर प्रसन्न झाले आहेत व त्या वेळी तुम्ही जे इच्छा मनात आणाल ते तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल.

याउलट पुजेत आपण नारळ फोडले व त्याचे खोबरे व्यवस्थित असेल, तर त्याचा प्रसाद आपण एकट्याने न ठेवता, मंदिरातील सर्वांना खोबऱ्याचा थोडा थोडा प्रसाद दिल्यास, आपल्याला आपल्या पूजेचे पूर्ण फळ मिळते. त्यामुळे नारळ फोडल्यावर ,त्याचा प्रसाद कोणालाही न वाटता नारळ तसेच घरी घेऊन गेल्यास, यामुळे हा प्रसाद भगवंतांपर्यंत पोहोचत नाही,असा शास्त्रामध्ये उल्लेख आढळतो.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *