नमस्कार मित्रांनो,
हिंदू धर्मात नारळाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. नारळाला शुभ फळ मानले जाते आणि प्रत्येक शुभ कार्यात नारळाचा वापर केला जातो. नारळाला लक्ष्मी देवीचे प्रतीक मानतात. प्रत्येक पूजेत नारळ असणे खूप महत्त्व आहे. यामुळे देवी लक्ष्मी प्र स न्न होते. कोठेही आपण तीर्थस्थानाला गेलो आधी नारळ घेऊन फोडले जाते व भगवंतांना देऊन आपणही खोबऱ्याचा प्रसाद घेतो.
नवरात्रातही देवीला प्रसाद म्हणून नारळ वाहिले जाते. तसेच गणपती मंदिरात, सर्व शक्तीस्वरूप देवीच्या देवळात नारळ फोडले जाते. जर आपण नारळ फोडले आणि ते आतून खराब निघाले तर आपल्याला खूप वाईट वाटते. आपल्या मनात असे येते की, देवी देवता आपल्यावर नाराज झाले आहेत. म्हणूनच नारळ खराब निघाले.
तर आता आपल्याबरोबर काही अनुचित घटना घडणार आहे. याच गोष्टीचा आपण विचार करीत बसतो पण विचार करण्यापूर्वी ही माहिती बघा. यात मी तुम्हाला नारळ खराब का निघते याचे काय शुभ अशुभ परिणाम होतात हे सांगणार आहे. जर तुमचे पूजेचे नारळ खराब निघाले तर त्याचा अर्थ असा नाही की, तुमच्याबरोबर काही तरी अशुभ होणार आहे.
किंवा काही तरी वाईट घटना घडेल. तुमचे पूजेचे नारळ खराब निघाले याचा अर्थ काय शुभ घडणार आहे. पूजेचे नारळ खराब निघणे शुभ असते. असे सांगितले जाते की, याद्वारे देव आपल्याला काहीतरी संकेत देत असतात. आज मी तुम्हाला नारळाच्या या संकेताविषयी माहिती देणार आहे.
जेव्हा आपल्याला या गोष्टींबद्दल माहिती नसते तेव्हा आपण त्याबद्दल काही तरी आपण भ्रम निर्माण करतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनात खूप मोठा प्रभाव पडतात. जेव्हा पूजेचे आर खराब निघते तेव्हा आपल्याला दुकानदाराचा ही राग येतो व त्याच्याशी आपण भांडायला देखील जातो.
पण दुकानदार सांगतो की, तुम्हाला देव पावला आहे. तेव्हा आपल्याला काहीही लक्षात येत नाही. परंतु याच्यापुढे तुमचे नारळ खराब निघाल्यास तुम्हाला राग येणार नाही तर आनंद होईल. पूजेचे नारळ जर खराब निघाले तर याचा अर्थ असा
होतो की, देवाने आपला प्रसाद स्वतः खाल्ला आहे म्हणूनच नारळ खराब निघते म्हणजे ते दुसरे कोणीही खाऊ शकणार नाही.
ते संपूर्ण नारळ भगवंताना अर्पण करण्यात येते. त्याबरोबरच त्याचा दुसरा अर्थ असाही होतो की, तुमची इच्छा मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे. देवाच्या पूजेच्या वेळी तुमची जी इच्छा असेल ती इच्छा नक्कीच पूर्ण होते. असा संकेत आपल्याला याद्वारे मिळतो. यापुढे जर तुमचे पूजेचे नारळ खराब निघाले तर तुम्ही दुखी होऊ नका.
या उलट आनंद माना की, भगवंत आपल्यावर प्र स न्न झाले आहेत व त्यावेळी तुम्ही जी इच्छा तुमच्या मनात आणाल ती इच्छा तुमची लवकरच पूर्ण होईल. जर आपण नारळ फोडले आणि ते चांगले निघाले तर काय करावे?
पूजेत आपण नारळ फोडले आणि त्याचे खोबरे व्यवस्थित असेल तर प्रसाद आपण एकट्याने न ठेवता मंदिरातील सर्वांना खोबऱ्याचा थोडा थोडा प्रसाद द्यावा.
त्यामुळे आपल्याला आपल्या पूजेचे पूर्ण फळ मिळते. तर काही व्यक्ती नारळ फोडतात व कोणालाही न वाटता ते नारळ घरी तसेच घेऊन जातात. यामुळे तो प्रसाद भगवंतापर्यंत पोहोचत नाही.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.