मित्रांनो, आपण अनेक देवीदेवतांची पूजा, अर्चना करीत असतो. आपल्या घरामध्ये सुख, शांती नांदावी यासाठी आपण व्रत, उपवास पूजा करीत असतो. या पूजेमधील सर्वात महत्त्वाची एक वस्तू ती म्हणजे नारळ. नारळ शिवाय कोणतीच पूजा पूर्ण होत नाही. नारळाला खूपच पवित्र मानले जाते. मित्रांनो नारळाचे झाड हे देखील खूपच पवित्र असते. नारळाच्या प्रत्येक गोष्टींचा माणसांच्या जीवनामध्ये फारच उपयोग होतो.
तर मित्रांनो अशा या पूजा सामग्रीमध्ये नारळाला विशेष असे स्थान दिले जाते. तर मित्रांनो आपण देवपूजा किंवा कोणत्याही प्रकारची पूजा करीत असताना फुले, नारळ आपण विकत आणतो आणि आपण देवी देवतांना अर्पण करीत असतो.
मित्रांनो आपण मंदिरात गेल्यानंतर किंवा घरांमध्ये पूजेमध्ये आपण असा नारळ फोडतो आणि मग त्या नारळाचे खोबरे जे असते ते आपण प्रसाद म्हणून सर्वांना वाटतो आणि आपण तो प्रसाद म्हणून ग्रहण देखील करतो. परंतु काही वेळेस हा पूजेचा नारळ खराब निघतो. त्यावेळेस आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे नाना प्रश्न आपल्या मनामध्ये घर करून जातात.
म्हणजेच आता नारळ खराब निघालेला आहे त्यामुळे आता आपणाला कोणते संकट येणार? कोणत्या अडचणीचा आपल्याला सामना करावा लागणार? आपले काहीतरी चुकले आहे का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. परंतु मित्रांनो चिंता करण्याचे कोणतेच कारण नाही. कारण नारळ जर खराब निघाला तर या मागचा संकेत असा आहे की, आपल्याला एखाद्या संकटांपासून आपली सुटका झालेली आहे.
म्हणजेच ते संकट आपल्यापर्यंत आता येणार नाही. त्यातून त्या अडचणीतून आपण मुक्त झालेलो आहोत आणि जी काही पूजा आहे ती पूजा आपली देवापर्यंत पोहोचली आहे. हा त्यामागचा संकेत असतो. मग आपल्या मनात असा प्रश्न येतो की, नारळ खराब निघाल्यावरच आपली पूजा देवापर्यंत पोहोचते का? तर असे काहीही नाही.
तर मित्रांनो नारळ फोडल्यानंतर खराब निघाला तर आपण आपल्या आयुष्यातून कोणते तरी मोठे संकट टळलेल आहे म्हणजेच आता कोणतेही संकट न येता आपल्या जीवनामध्ये खूप काही चांगले होणार आहे. प्रत्येक कामात आता यश प्राप्त होणार आहे. असा सकारात्मक विचार आपण करायचा आहे. आता जीवनात कोणत्याच अडचणी येणार नाही आणि आपल्याला मोठ्या संकटातून मुक्ती मिळालेली आहे म्हणजेच ते संकट आता दूर गेलेल आहे.
हा त्यामागचा संकेत असतो. येणारे दिवस हे आपले खूपच आनंदाचे आणि खूप सुखा समाधानाचे असणार आहेत हा त्यामागचा संकेत असतो. कोणत्याही नकारात्मक गोष्टी मनात न आणता तुम्ही नारळ खराब निघाल्यानंतर दुसरा एखादा नारळ खरेदी करून तो देवी देवतांना अर्पण करायचा आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.