प्रसाद नेहमी उजव्या हातात का घ्यावा? नक्की जाणून घ्या

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असते आणि नित्यनेमाने आपण अगदी मनोभावे पूजा आरती करत असतो. आपल्या अनेक अडीअडचणी, संकटे हे आपण देवांना सांगत असतो आणि त्यापासून सुटका व्हावी अशी प्रार्थना देखील आपण देवासमोर करत असतो.

देवपूजा करीत असताना आपण आरती झाल्यानंतर आपण प्रसाद देखील दाखवतो. हा प्रसाद आपण आपल्या उजव्या हातामध्ये घेत असतो. प्रसाद नेहमी उजव्या हातातच का घ्यावा यामागचे कारण मात्र बऱ्याच जणांना माहिती नाही. तर प्रसाद नेहमी उजव्या हातातच का घ्यावा? यामागचेच कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे.

प्रसाद घेताना आपल्या घरामधील अनेक लहान मुले सहजच डावा हात देखील पुढे करतात. परंतु आपण त्यांना उजवा हात पुढे करा असे म्हणून त्यांच्या उजव्या हातामध्ये प्रसाद देत असतो आणि त्यांना सांगत देखील असतो की उजव्या हातामध्ये प्रसाद घ्यायचा आहे. तर हा प्रसाद उजव्या हातामध्ये घेण्यामागचे नेमके कारण कोणते आहे याविषयी आता सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मंदिर असू द्या किंवा घर हिंदू धर्म संस्कृतीनुसार देवाची पूजा किंवा आरती झाल्यावर प्रसाद वाटला जातो. हा प्रसाद म्हणजे इश्वाराची कृपाच मानली जाते. प्रसाद घेण्याची एक विशिष्ट पद्धत असते. प्रसाद नेहमी उजव्या हातानेच घेतला जातो. उजव्या हाताखाली डावा हात धरला जातो.

तर आपल्या हिंदू धर्मामध्ये तसेच शास्त्रामध्ये डाव्या हाताने प्रसाद घेणे हे खूपच अशुभ मानले गेलेले आहे. अनेकांना ही अंधश्रद्धा देखील आहे असे वाटते. मित्रांनो कोणत्याही शुभकार्याची सुरुवात उजव्या हाताने केल्याने आपल्याला अनेक सकारात्मक परिणाम होतात अशी हिंदू धर्मामध्ये मान्यता देखील आहे.

धार्मिक कार्य करताना यज्ञ, दान करत असताना आपण उजव्या हातानेच करतो. हवन करताना तसेच यज्ञ नारायण भगवंताला आहूती देताना उजव्या हाताचा आपण वापर करतो. म्हणजेच उजव्या हातामध्ये सकारात्मक ऊर्जा सामावलेली असते. उजवा हात हा सकारात्मक ऊर्जा देणारा असतो.

हिंदू परंपरेनुसार प्रसाद म्हणजे भगवंतांचा आशीर्वाद मानला जातो. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी ही प्रथा केलेली आहे. शिवाय डाव्या हाताचा वापर हा शारीरिक स्वच्छतेसाठी करण्यात येत असल्याने प्रसादाचे पावित्र्य राखण्यासाठी डाव्या हाताचा वापर न करणे उत्तम मानले जाते. त्यामुळेच प्रसाद हा भगवंताचा आशीर्वाद असल्याकारणाने आपण हा प्रसाद आपल्या उजव्या हाताने घ्यायचा आहे.

तर तुम्ही देखील कोणत्याही मंदिरात किंवा घरामध्ये पूजा झाल्यानंतर ज्यावेळेस प्रसाद घेत असाल त्यावेळेस तुम्ही देखील उजव्या हातानेच हा प्रसाद घ्यायचा आहे. डाव्या हाताने प्रसाद घेणे टाळायचे आहे. उजव्या हाताने प्रसाद घेणे हे आपल्यासाठी आणि भगवंतासाठी देखील शुभच मानले जाते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *