नशिबाने साथ सोडली असेल तर घाबरू नका इथूनच सुरू होतो स्वामींचा खेळ फक्त ‘हे’ एक काम करा!

अध्यात्मिक राशिभविष्य वायरल

मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या सगळ्या आशा समाप्त होतात. आपले नशीब साथ देणे सोडून देते. सगळ्या वाटा ज्यावेळी बंद होतात. त्यावेळी आपल्याला खूप एकटे वाटू लागते. आपल्या आजूबाजूला सर्वकाही असून देखील आपल्याला काहीच नसल्यासारखे वाटते एकटेपणा जाणवू लागते आणि सर्व असहाय्य वाटू लागते. आपल्याला सगळ्या बाजूने संकटाने आपल्याला घेरून ठेवले आहे. असे आपल्याला वाटते. अशा वेळी देव सुद्धा आपणास साथ देत नाहीत. आपण एकटे आहोत असे वाटत असते. परंतु हे सर्व त्यांच्या मर्जीने चालत आहे. ते आपल्याला माहित नसते.

अशा वेळी स्वामी समर्थ महाराजांचा खेळ सुरू होतो. यावेळी स्वामी लिला सुरू होते. म्हणून स्वामी समर्थ महाराज म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. जो सेवेकरी मला श्रद्धेने सर्व सेवा करतो. माझ्यावर विश्वास ठेवतो. त्यांच्या सदैव मी पाठीशी उभा राहतो आणि त्यांच्यावर कसल्याही प्रकारचे संकट येऊ देत नाही. मित्रांनो हे स्वामीनी भक्तांना दिलेले अभिवचन आहे. आणि स्वामी समर्थ महाराज असे देखील म्हणतात की मी तुमचाच आहे. मला फक्त तुमच्या शब्दांची आणि नामस्मरणाचे भूक आहे. म्हणून संकटाच्या काळात तुम्ही फक्त माझे नामस्मरण करा.

मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. त्या संकटातून तुमची सुटका मी निश्चितच करणार आहे. संकटात सापडलेली आपले नाव स्वामी समर्थ महाराज किनाऱ्यावर तारून आणणार आहेत. स्वामी भक्तांना आपली जर आता आशा संपली असेल. किंवा नशिबाने आपल्याला साथ देणे सोडले असेल आणि आपल्या चारही बाजूना आपल्याला अंधार दिसत असेल. अशावेळी आपल्या जवळ एकच उपाय उरतो. तो म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत तल्लीन होण्याचा. अशावेळी आपल्याला स्वामींची सेवा सुरू करण्याची खूप गरज असते. मित्रांनो अशा वेळी आपण स्वामींची एक सेवा कोठेही कोणत्याही वेळेला करू शकतो.

ही एक सेवा करण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धा असणे खूप जरुरी आहे. ती सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या नामाचा आपल्याला सदैव नामस्मरण करायचा आहे. या नामस्मरणामधे एवढी ताकत आहे. की नशिबाने आपली साथ देणे सोडले असले तरी सुद्धा स्वामी समर्थ महाराज आपले नशीबच बदलून टाकतात. आणि अनेक अडचणी आल्या असल्या तरी सुद्धा स्वामी समर्थ महाराज आपल्याला त्या अडचणींमधून धावत येऊन बाहेर काढतात. आणि त्या अडचणी पासून आपली सुटका करून देतात. आपले सगळे रस्ते बंद झाले तरीसुद्धा नवीन रस्त्यांची वाट स्वामी समर्थ महाराज स्वतः आपल्याला दाखवतात.

मित्रांनो ज्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये चारही बाजूंना अंधार दाटून येतो. त्या वेळी प्रकाश म्हणून स्वामी समर्थ महाराज स्वतः आपल्या आयुष्यामध्ये येतात. आणि आपली सगळ्या संकटातून सुटका करून देतात. व आपल्या सदैव रक्षण करतात. आणि हाच स्वामींचा खेळ या खेळाला स्वामीची लीला देखील म्हणतात. मित्रांनो आपले स्वामी आपली परीक्षा पहात असतात. त्यामुळे स्वामींची सेवा आणि त्याचे नामस्मरण करणे यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका. आपल्या आयुष्यातील भरपूर अडचणी स्वामी समर्थ महाराज दूर करतात. म्हणून या सगळ्या अडचणींवर एकच उपाय आहे तो उपाय म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण आणि म्हणून स्वामींचे नामस्मरण सतत करत राहा.

आणि त्यांच्या नावाचा अखंड जप करा. स्वामींचे नाम स्मरण करून समाधानी व्हा. सुख असो वाद दुःख मन व्याकुळ असो वा चिंतेत नामस्मरण सदैव आणि सर्व प्रसंगात करत राहा. आनंदाचा काळ असो कठिण काळ असो सण असो किंवा अनुकुल काळ असो. म्हणजेच विश्रांतीचा वेळ असो की झोपेची वेळ असो नामस्मरण करत राहा. एखादा कठीण प्रसंग असो एखादी समस्या असो किंवा एखादे संकट आले असेल तरी स्वामींना आठवत राहा. चालताना व्यवसाय करताना जेवताना आनंदात किंवा विविध गोष्टींचे सेवन करताना स्वामी नाम घेणे विसरू नका आणि मित्रांनो श्री स्वामींनी जो उद्देश केला त्यात नामस्मरणाला अधिक महत्त्व दिले होते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *