लक्ष्मी येण्याच्या वेळी तीन वेळा बोला हा मंत्र; लक्ष्मीची कृपा होईल!

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असावा तसेच लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहावी असे वाटतच असते. त्यासाठी आपण लक्ष्मीचे अनेक व्रत करतो उपवास करतो आणि पूजा विधी देखील करीत असतो. तर आज मी तुम्हाला लक्ष्मी येण्याच्या वेळी म्हणजे लक्ष्मी येण्याची वेळ ही संध्याकाळची, तिन्ही सांजेची वेळ असते आणि या तिन्ही सांजेच्या वेळेसच तुम्हाला एक असा मंत्र सांगणार आहे हा मंत्र तुम्ही जर बोलला तर यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर होणार आहे.

हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला तीन वेळेला बोलायचा आहे. संध्याकाळच्या वेळेस म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेस लक्ष्मीचे आगमन होत असते आणि म्हणूनच आपण सर्वांनी संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. तसेच घरात असणाऱ्या देवांची पूजा करावी. तसेच देवघरांमध्ये दिवा प्रज्वलित करावा. तर ही जी संध्याकाळची म्हणजेच तिन्ही सांजेची वेळ असते ही वेळ खूपच महत्त्वाची मानली गेलेली आहे.

तर आज मी जो तुम्हाला मंत्र सांगणार आहे हा जर मंत्र तुम्ही तीन वेळेस बोलला तर यामुळे माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या घराकडे आकर्षित होईल. तसेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम राहील. तर संध्याकाळच्या वेळी तुम्ही देवाजवळ दिवा लावता, धूप अगरबत्ती लावता हे सर्व करत असताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल.

तर हा जो मंत्र आहे हा मंत्र खूपच प्रभावशाली असा मंत्र आहे. तर मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस तुम्ही आपल्या घरामध्ये अजिबात अंधार करू नये. यावेळी तुम्ही काहीही खाऊ नये किंवा पिऊ नये. तसेच या तिन्ही सांजेच्या वेळी झोपायचे सुद्धा नाही किंवा भांडणे, वाद-विवाद देखील आपण टाळायचे आहेत. घरामध्ये स्वच्छता ठेवून प्रसन्न वातावरण केले.

तरी यामुळे माता लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये येईल आणि या विशेष गोष्टींची तुम्ही नक्कीच काळजी घ्यायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये आजारपण येणार नाही. पैसा इतरत्र खर्च होणार नाही. तसेच आपल्याला आर्थिक समस्या देखील जाणवणार नाहीत. तर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही तुळशीजवळ तसेच आपल्या घरामध्ये दिवा लावल्यानंतर हा प्रभावशाली मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र काहीसा असा आहे.

ॐ चन्दनस्य महत्पुण्यं, पवित्रं पापनाशनम्।
आपदां हरते नित्यम्, लक्ष्मीस्तिष्ठति सर्वदा॥

या मंत्राचा ३ वेळा उच्चारण करायचे आहे. ह्या मंत्रामुळे तुम्ही माता लक्ष्मीला घरामध्ये स्थायी होण्याची प्रार्थना करत आहात. हा मंत्र अगदी मनोभावे, कोणताही स्वार्थ न ठेवता , कोणताही नकारात्मक विचार न करता ३ वेळा बोलायचा आहे. संध्याकाळी दिवा , धूप लावून झाल्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे.

तसेच जर तुमच्यावर कर्ज असेल तर अशावेळी फक्त तेलाचा किंवा तुपाचा दिवा न लावता त्या दिव्यामध्ये एखादी काळीमिरी किंवा एखादी लवंग अवश्य टाका. तर असा हा प्रभावशाली मंत्र तुम्ही लक्ष्मी येण्याच्या वेळी म्हणजेच संध्याकाळी, तिन्ही सांजेच्या वेळी बोलला तर या तुमचे जे काही कर्ज असेल ते कर्ज फिटून जाईल.

तसेच घरामध्ये पैसा येऊ लागेल. आर्थिक समस्या दूर होतील आणि आपल्या घरामध्ये प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होईल आणि माता लक्ष्मी कायम आपल्या घरामध्ये वास करेल. तर असा हा प्रभावशाली मंत्र तुम्ही देखील अवश्य म्हणा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *