आपले कुटुंब सुखी आणि सुरक्षित राहण्यासाठी रोज संध्याकाळी करा ‘हा’ एक उपाय !

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो आपले कुटुंब सुखी आणि सुरक्षित रहावे, असे कोणाला वाटत नाही. सगळीच जण सुख शोधण्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित सुखी आनंदी राहावेत घरी आल्याबरोबर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपले मन प्रसन्न झाले पाहिजे. आणि शांततेत सुखा समाधानात आपले कुटुंब असावे असे प्रत्येकाला वाटते.

आणि त्यासाठी प्रत्येकाची धडपड ही चालूच असते. त्यामुळे आपले कुटुंब सुखी आणि सुरक्षित राहण्यासाठी आपण बरेच उपाय प्रयत्न करतो. त्याचबरोबर भरपूर कष्ट देखील करतो. कारण आपली कुटुंब सुखी, आनंदी, सुरक्षित राहण्यासाठीच आपण काम करत असतो. त्याबरोबरच आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे.

तो म्हणजे देवाचे नाव घेणे. देवाची सेवा करणे, त्यांची पूजा करणे, ही सुद्धा सेवा करणे खूप गरजेची असते. सुखी आणि सुरक्षित राहण्यासाठी पैसा हा पुरेसा आहे. का तर नाही पैसा त्यासोबत देवाचा आशीर्वाद या दोन्ही सुद्धा गोष्टी हव्या आहेत. या दोन्ही गोष्टी ज्यांना मिळतात. ते लोक सुखी राहतात त्याचबरोबर ते सुरक्षित देखील असतात.

आपल्यापैकी काहीजण म्हणतील की होय आम्ही पैशाने सुखी राहू शकतो. पण पैशासोबतच देवांचा आशीर्वाद देखील खूप महत्त्वाचा आहे. आजच्या या लेखांमध्ये आपण आपले कुटुंब सुखी आणि सुरक्षित राहण्यासाठी कोणता व कसा करायचा आहे. याची माहिती घेणार आहोत. हा उपाय आपल्याला दररोज संध्याकाळच्या वेळी करायचा आहे.
ज्यावेळी आपण संध्याकाळची देवपूजा करतो.

त्यावेळी दररोज आपल्याला हा उपाय करायचा आहे. देवाला देवा अगरबत्ती लावून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय लगेचच करायचा आहे. आपल्यापैकी काही सेवेकरी संध्याकाळच्या काही सेवा करत असतात. त्या सेवे सोबतच हा उपाय देखील करायचा आहे. हा उपाय केल्याने आपले कुटुंब सुखी आणि सुरक्षित राहील. आणि आपल्या कुटुंबामध्ये शांतता, सुख, समाधान सर्वकाही राहील.

आपण जो उपाय करणार आहोत, तो उपाय करण्यासाठी आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांचे नित्यसेवा हे पुस्तक असायला हवे. स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवा या पुस्तकामध्ये कालभैरवाष्टक दिलेले आहे. या कालभैरवाष्टकाचे आपल्याला दररोज संध्याकाळी एक वेळेस वाचन करायचे आहे. कालभैरवाष्टक वाचण्यापूर्वी देवघरामध्ये दिवा आणि अगरबत्ती लावायचा आहे.

त्यानंतरच कालभैरवाष्टक वाचायचे आहे. कालभैरवाष्टक एक वेळेस वाचून झाल्यानंतर आपण जे अगरबत्ती लावलेली आहे. त्या अगरबत्तीचा टिळा आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने कपाळावर लावायचा आहे. रोज संध्याकाळच्या वेळी कालभैरवाष्टक म्हणून झाल्यानंतर न चुकता त्या अगरबत्तीचा टिळा घरातील प्रत्येक सदस्यांच्या कपाळाला लावायचा आहे.

हा उपाय आपल्याला दररोज संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय दररोज घरामध्ये केल्याने आपले कुटुंब सुखी तर होतेच त्याचबरोबर त्यांचे रक्षण देखील होते. साक्षात दैवी शक्ती आपल्या घरामध्ये वास करते. आणि तुमची व तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करतात. कालभैरवाष्टक घरामध्ये म्हटल्याने घरातील वातावरण प्रसन्न होते. बरेच जणांनी हा उपाय करून याचा लाभ घेतलेला आहे. तुम्ही देखील हा उपाय करून याचा लाभ घेऊ शकता.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *