मित्रांनो प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अडचणींचा सामना हा करावा लागतो. कोणाला कामांमध्ये यश प्राप्त होत नसेल तर काहीजणांना आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल या सर्व काही अडचणीमुळे आपल्या घरामध्ये सतत भांडणे होत राहतात.
यामुळे मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील टिकत नाही. तर या अडचणींवर आपण अनेक सारे उपाय देखील करत असतो. काही वेळेस काही उपायांचा आपल्याला परिणाम देखील दिसून येत नाही. तर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला होळीच्या रात्री करायचा आहे.
म्हणजे तुम्हाला होळीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. यामुळे तुमच्या ज्या काही पैसे संबंधित अडचणी असतील नोकरी विषयक काही अडचण असेल तर ती सर्व निघून जाईल. तर मित्रांनो होळीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी एक नारळ घ्यायचा आहे. हा नारळ पूर्णपणे सोलून घ्यायचा आहे.
त्याला शेंडी देखील ठेवायची नाही. त्या नारळाला तीन छिद्रे असतात त्यातील एका छिद्र्याला होल पाडून त्यातील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि तुम्हाला त्या नारळामध्ये तूप घालायचे आहे आणि या नारळामध्ये तूप घातल्यानंतर एका कोऱ्या कागदावर तुमच्या ज्या काही अडचणी असतील, इच्छा असतील या सर्व त्या काठावर लिहायचे आहेत आणि तो कागद नंतर तुम्हाला नारळावरती ठेवायचा आहे आणि लाल दोऱ्याने पूर्ण नारळ गुंडाळायचा आहे.
तो नारळ अजिबात दिसता कामा नये पूर्णपणे तो लाल रंगाच्या दोऱ्याने गुंडाळायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला होळीच्या रात्री त्या होळीमध्ये अर्पण करायचा आहे. यामुळे तुमच्या सर्व अडचणी नष्ट होतील आणि तुम्हाला सुखाचे दिवस नक्कीच येतील. तसेच तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये जर प्रगती हवी असेल तर तुम्ही 21 गोमती चक्र हे होळीच्या रात्री शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत. यामुळे तुमच्या ज्या काही नोकरी व्यवसायामध्ये अडचणी येत असतील त्या सर्व दूर होतील.
जर आपल्या घराला वाईट दृष्ट लागलेली आहे म्हणजेच घरामध्ये नकारात्मक शक्ती असतील तसेच नकारात्मक विचार सतत तुमच्या मनामध्ये येत असतील तर तुम्ही होळीच्या रात्री होळी पेटवल्यानंतर त्यातील थोडासा अग्नी घ्यायचा आहे आणि तो एका मातीच्या किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये तो अग्नी घालायचा आहे.
आपल्या घराच्या आग्नेय कोपऱ्यात ते भांडे ठेवायचे आहे त्या भांड्याच्या समोर तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे. यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती बाहेर जातील.तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे उपाय अवश्य होळीच्या दिवशी करून पहा. यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील. सर्व अडचणी नक्कीच दूर होतील आणि घरातील नकारात्मक शक्ती देखील नष्ट होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.