हे 5 संकेत सांगतात की तुमचा पुनर्जन्म झाला आहे.

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

मृत्यू झाल्यानंतर व्यक्ती पुन्हा जन्म घेते का? माणसाचा पुनर्जन्म होतो का? अशा प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. हिंदूधर्म शास्त्रात सुध्दा असे मानले जाते की, माणसाचा पुनर्जन्म होतो. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशा 5 गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत की, ज्यामध्ये हे सिध्द होत की, तुमचा पुनर्जन्म झालेला आहे.

चला मग जाणून घेऊया या 5 गोष्टी कोणत्या आहेत. मित्रांनो कधी असे झाले का? की तुम्हाला वारंवार एकच स्वप्न पडतं. त्यामध्ये तुम्हाला असे काही लोक दिसतात जे तुमच्या ओळखीचे नाहीत तरी पण ते तुम्हाला ओळखीचे वाटतात. हया जन्मात तुम्ही या लोकांना कधीही पाहिले नाही. मात्र तरीही हे लोक तुम्हाला तुमच्या परिचयाचे आणि जवळचे वाटतात.

मित्रांनो, हे स्वप्न तुम्हाला इशारा देतो की, तुमचा पुनर्जन्म झालेला आहे. ज्या लोकांना तुम्ही स्वप्नात पाहताय, या लोकांशी तुमचे खूप जवळचे निकटचे संबंध होते. एखाद्या व्यक्तिला पाण्याची खूप भीती वाटते. एखाद्या व्यक्तीला अंधाराची भीती वाटते. एखादा व्यक्ती उंच डोंगरावर गेला, उंच इमारतीवर गेला तर त्याला त्या उंचीची खूप भीती वाटते.

मात्र या जन्मामध्ये भीती वाटावी अशा प्रकारची कोणतीही घटना या जन्मात घडलेली नसते, तरीही या गोष्टीची भीती का वाटते. कदाचित पुनर्जन्मामध्ये अशा काही घटना घडलेल्या असतील. कदाचित तुम्ही पाण्यामध्ये बुडत असाल आणि तुमचा मृत्यू पाण्यात बुडून झालाय. कदाचित तुमचा उंच इमारतीवरून पडून मृत्यू झाला असेल.

कदाचित अंधारामध्ये तुमच्याबरोबर काहीतरी अनिष्ट घटना घडली असेल. पुनर्जन्मात घडलेली ही घटना असते ज्याची भीती तुम्हाला अजूनही या जन्मात वाटत आहे. ही गोष्ट या गोष्टीकडे संकेत करते की, तुमचा पुनर्जन्म झालेला आहे. मित्रांनो, कधी असे झाले का? की एखाद्या व्यक्तीशी तुमची काहीही ओळख नाही तुमचा परिचय नाहीय.

तरीही तुम्हाला ती व्यक्ती जवळची व ओळखीची वाटते. तरीही त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला प्रेम वाटते, आत्मीयता वाटते. याचा संबंध मागच्या जन्माशी असू शकतो. कधी कधी अस सुद्धा होत की, एखाद्या व्यक्तीला सायकल चालवण्याची भरपूर आवड आहे किंवा पाण्यात पोहण्याची आवड आहे. धनूरविद्याची आवड आहे. पण तसे पाहिले तर तुमचा या गोष्टीशी कधीही संबंध आलेला नाही.

मात्र एखाद्या वेळेस आपोआप सायकल हातात येताच ती सायकल आपण अगदी वेड्यासारखी चालवतो. तसेच धनुरविद्या अवगत नसताना सुध्दा अगदी सहजरीत्या धनुष्य बाण चालविला जातो. त्याचप्रमाणे नदी, तलाव दिसताच त्यामध्ये उडी मारून खूप पोहण्याचे मन होते. त्या गोष्टीची प्रचंड आवड त्या व्यक्तीमध्ये दिसून येते. याचा संबंध सुद्धा मागच्या पुनर्जन्माशी असण्याची शक्यता असते.

मागच्या जन्मी या गोष्टींची आवड असेल तुम्ही यामध्ये प्राविण्य मिळवलेले असेल त्याच गोष्टींची आवड तुम्हाला या जन्मात निर्माण होते असे म्हणतात. कधी कधी असे सुद्धा होत की, एखाद्या घराण्यात एखादी कला अजिबात अवगत नसते. उदाहरण पाहायचे झाले तर एखाद्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या कधीही गाणं म्हंटलेच नसत.

त्यांचा आणि त्या गाण्यांचा कधीही संबंध आलेला नसतो. परंतु नवीन जन्मलेलं मुल मात्र जस बोलू लागत तसं ते गाण्याकडे आकर्षित होत. त्याला गाण्याबद्दल त्याला आवड निर्माण होते आणि कुणीही काहीही न शिकवता उत्तम प्रकारे गाणं म्हणायला लागते.

या गोष्टीचा आश्चर्य घरातील सगळ्या लोकांना वाटते की, याला असे पोषक वातावरण घरात नसताना हा इतका चांगलं गाणं म्हणू शकतो याचा संबंध सुद्धा तुमच्या मागच्या पुनर्जन्माशी असू शकतो. आपल्या हिंदू धर्म शास्त्रानुसार पुनर्जन्म होतो असे मानले जाते.

याचे वर्णन आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा आढळते. परंतु हे सुद्धा तितकंच खरे आहे की, मनुष्य जन्म मिळणं हे अतिशय दुर्भल आहे. त्यामुळे मिळालेला हा मनुष्य जन्म आपण आनंदाने जगावे हे महत्वाचे आहे. त्याचबरोबर सत्कर्म करत जगावं इतरांना मदत करत जगावे हे सुद्धा तितकंच महत्वाचे आहे.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *