नमस्कार भक्त हो श्री स्वामी समर्थ भक्त हो जसे की आपणास सर्वांना माहीत आहे जिथे गोड असेल तिथे मुंग्या या येणारच आणि जिथे साप असेल तिथे बऱ्याचशा गोष्टी दूर पळणारच म्हणजेच जी वस्तू जिथे असेल तिथेच त्या वस्तूचे आकर्षण किंवा लगाव असतो भक्त हो आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये काही शंका अशा असतात की आमच्या घरामध्ये काम पण चांगले आहे आणि धंदा व नोकरी ही चांगली आहे परंतु तरीही पैसे टिकत नाहीत घरात शांती नाही घरामध्ये नेहमी भांडणे क्लेश कलह यासारख्या गोष्टी आहेत तर भक्त हो आपणास सांगू इच्छितो की हर एका वस्तूमध्ये एक प्रकारची ऊर्जा वास करत असते आणि ती वस्तू आपल्या हिशोबाप्रमाणे ऊर्जा देत असते.
जसे आपले ऋतू असतात ऋतू जेव्हा डिसेंबरचा असतो तेव्हा आपणास थंडी वाजू लागते आणि एप्रिल मे चा महिना असतो तेव्हा गरम होऊ लागते तर भक्त हो अगदी याच प्रमाणे ऋतू वेळ वस्तू आणि व्यवहार हे सर्व काही बदलत राहतात आणि बदलत्या वस्तूंच्या सोबत आपल्या जीवनातही सुखदुःख बदलत राहतात भक्त हो आज मी ज्या आठ वस्तू सांगण्यास जात आहे त्या आठ वस्तू जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुरंत त्यांना घरातून उचलून बाहेर फेका त्या सर्वांत खतरनाक वस्तू आहेत ज्या तुम्हाला पुढे जाण्यापासून तुमची प्रगती होण्यापासून अडथळा निर्माण करतात आणि तुमची प्रगती होऊ देत नाहीत.
तर सगळ्यात पहिली वस्तू आहे झाडू मी बऱ्याच वेळा सांगितले आहे की झाडूला कधीही आडवे ठेवू नका काय चाललंय त्याला नेहमी सरळ व उभ्या स्थितीत ठेवावे पण झाडू जेव्हा ढिल्ला होऊन जातो तिचा एक एक हीर किंवा तिची काडी निघत असेल आणि लोक तिलाच वापरून आपल्या घरात झाडू मारत राहतात जर झाडू झिजली असेल किंवा खराब झाली असेल तर तिला अगदी घट्ट आवळून बांधून घेऊन आपल्या घरात व बाहेर झाडू वापरली पाहिजे भक्त हो आपल्या शास्त्रांमध्ये झाडू आणि मिठाला लक्ष्मीच्या प्रतिनिधीच्या चिन्हांच्या रूपात आपल्या घरामध्ये सांगितले गेले आहे.
मित्रांनो ज्याच्या घरामध्ये झाडू ढिल्ले असेल आणि एकेक काडी त्यातून निघत असेल तर त्या घरामध्ये पैसे एकेक करून निघत जातात घरातील सुख शांती निघून जाईल आणि सर्व काही संपून जाईल यासाठी या झाडूला व्यवस्थित ठेवा आणि वापरा भक्त हो या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही ध्यान देऊन रहा कारण या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या घरासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत ज्या की तुमच्या जीवनाला बदलण्यासाठी खूपच मोठं काम करत असतात आणि यासाठीच या झाडूला घराच्या वायव्य नॉर्थ वेस्ट मध्ये उभ्या स्थितीत ठेवा आणि झाडूला कधीही घराच्या बाहेर ठेवता कामा नये काही घरांमध्ये घरातील बाहेरच्या पॅसेजमध्ये झाडू पडून असते तर त्या घरामध्ये कधीही सुख शांती आणि लक्ष्मीवास करत नाही.
कारण घराच्या लक्ष्मीला घराच्या बाहेर ठेवतात यासाठी झाडूचा घरातील व्यवहार काळजीपूर्वक करावा आणि भक्त हो दुसरी वस्तू ती ही की आज काल मंत्र तंत्र आणि यंत्र यासारख्या उपायांचा खूपच वापर केला जात आहे कुठे कुणी धागा दोरा आणण्यासाठी जातो तर कोणी यंत्र आणण्यासाठी जातो प्रत्येक घरामध्ये छोटे-मोठे यंत्र किंवा दोरा ताबीज कोणाकडूनही दिला गेलेला असतो भक्त हो आपणास सांगू इच्छितो की हे मंत्र यंत्र लिहून देणारे कोणी मांत्रिक किंवा तांत्रिक तसेच ताबीज धागा दोरा बनवून देणारे लोक जर पूर्णपणे विद्वान असतील तर काही हरकत नाही किंवा कोणती काळजी धास्ती नाही ते निश्चितच काही शुभ काम करूनच सोडते.
पण जर त्या यंत्रांमध्ये एक बिंदू एक मात्रा एक चिन्ह किंवा एक अक्षर ही चुकून राहिलं गेलं असेल तर निश्चितच त्या देवतांच्या शक्तींच्या कोपाचे भागीदार तुम्ही बनाल कारण ते चुकीचे यंत्र तंत्र तुम्हाला तुमच्या घरामध्ये संकट व पिढा उत्पन्न करेल आणि आजकाल लोकं आपल्या शत्रूंना सतवण्यासाठी परेशानीत अडचणीत घालण्यासाठी असे उपाय करत राहतात तर भक्त हो मी आपणास सांगू इच्छितो चे दुसऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत राहतात त्यांना मी सावधान करू इच्छितो की दुसरे तर परेशान होतील की नाही हे तर देवचं जाणे पण परेशानित अडचणीत मात्र तुम्ही नक्कीच याल जे दुसऱ्याच्या वाईटाचा विचार करतात.
कारण मित्रांनो दुसऱ्यांचे नुकसान करण्याचा उपाय सांगणारा आणि त्या उपायास करणारा हे सर्व दोघेही नेहमी नुकसानीतच राहतील यासाठी अशा चुकीच्या यंत्रांना चुकीच्या व वाईटांच्या वस्तूंना जर तुम्ही घरात ठेवले असेल किंवा तुम्ही बाळगत असाल तर तुरंत त्यांना घरातून उचलून बाहेर फेका किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्या कारण तुम्हाला तर माहीतच नसते की मंत्र काय असते यंत्र कसे लिहिले जाते आणि आज काल गल्ली गल्ली मध्ये असे मंत्र यंत्र लिहून देणारे उत्पन्न झालेले आहेत जे पन्नास रुपये शंभर रुपये पाचशे रुपये घेऊन यंत्र देत आहेत ताबीज खंडे दोरे देत आहेत मुलांच्या गळ्यात घालत आहेत आणि घरातही ठेवण्यास देत आहेत घरात टांगण्यासही देतात.
अशा प्रकारच्या चुकीच्या वस्तू तुमच्या घरामध्ये निश्चित रूपाने नेगेटिव एनर्जी ला घेऊन येतात आणि ती निगेटिव्ह एनर्जी तुमच्या जीवणाला भविष्यामध्येच निगेटिव्ह करून सोडते आणि तर काही लोक अशी आहेत जे मुसलमान लोकांकडून जाऊन यंत्र घेऊन येऊन आपल्यापैकी काही हिंदू लोक आपल्या घरामध्ये टांगत असतात आणि बोलतात की याने सुख मिळेल तर भक्त हो आपणास सांगतो सुख तर मिळणे खूपच दूर राहिले आपली कुलदेवता ही अशी नाराज होईल की पुन्हा तिला सात पिढ्यापर्यंतचा काळ तिला मानवण्यातच तुमचा जाईल तर यासाठीच आपल्या धर्माला सोडून बाहेर उपाय शोधण्यास जाऊ नका.
आणि यावरील उपाय म्हणजे आपल्या इष्ट देवतांच्या चरणांची भक्ती आहे आणि या उपायाला जर धरून चालाल तर कल्याण हे निश्चितच आहे आणि मित्रांनो हो पुढील तिसरी वस्तू काही लोक घरातील बेडशीट असो उशी असो दोन वर्षे पाच वर्षे त्यांचाच वारंवार वापर करत राहतात धूऊन धूऊन ही करत राहतात पण जेव्हा रात्री आपण झोपी जातो तेव्हा प्रमांडिय ऊर्जेला आपल्या आपल्या शरीरात समर्पित केले जाते नवीन ऊर्जा आपल्यात येते आणि नकारात्मक ऊर्जा आपल्यातून निघून जात असते यासाठी पूर्ण झोप न झालेला एकदम थकून जातो आणि झोप पूर्ण झाल्यानंतर एकदम फ्रेश फील करतो कारण ब्रम्हांडीय प्राकृतिक ऊर्जेला आपण ग्रहण करत असतो.
आणि आपल्या आतील जो विष वायू असतो तो बाहेर सोडला जातो नकारात्मक भक्तीच्या तरंगाणे बाहेर सोडला जातो आणि ही अशी पूर्ण नकारात्मक शक्ती ही मात्र आपल्या उशीमध्ये बेडशीटला बेड कव्हर ला बेडरूमच्या कर्टनला प्रभावित करत असते आणि मनुष्य झोपत असताना आपल्यातील नकारात्मक ऊर्जेला बाहेर सोडत असतो आणि अशा या वस्तूंना जर व्यक्ती जास्त काळापर्यंत तसाच वापरत असतो तर त्या वस्तूतील प्रभावित नकारात्मक शक्ती ऊर्जा पुरुषाच्या मनाला ताणतणावात घालतात तुमच्या मनाला चल बिचल करतात तुमच्यात राग निर्माण करणे कोणत्याही कार्यात तुमचे मन न लागणे ते असफल करणे.
अशी बरीच काही कार्य त्या नकारात्मक शक्ती करत असतात त्यामुळे अशा वस्तूंना कमीत कमी आठवड्यातून एक वेळा तरी धुवून वापरावे आणि एका वर्षातून किमान एकदा तरी त्यांना घरातून बाहेर करून नवीन वापरात आणावे जास्तीत जास्त 500 ते 1000 रुपयाचा खर्च होईल पण जो नवीन उशी नवीन कव्हर नवीन बेडशीट हे तुमच्या घराला व तुमच्या नवीन जीवनाला ऊर्जा घेऊन येईल तर भक्त हो याही एका छोट्याशा गोष्टीची काळजी तुम्ही घ्यावी आणि जर अशा जुन्या घाणेरड्या वस्तू कपडे जरी घरात कुठे पडून असतील तर त्यांनाही घरातून बाहेर काढून टाकावे याने तुमचे आणि तुमच्या भविष्याचे कल्याण नक्कीच होईल याचे ध्यान ठेवाल तर फारच चांगले आहे.
आता चौथी वस्तू आहे आरसा भक्त हो आरसा ही एक अशी वस्तू आहे आपल्या शरीरातील ऊर्जेला अगदी जसेच्या तसे प्रतिबिंबित करत असतो आपण जसे आहोत त्या शक्तीला अगदी जसेच्या तसे प्रतिबिंबित करण्याची शक्ती जर कोणामध्ये असेल तर तो आहे आपल्या घरातील आरसा ज्या घरामध्ये तुटलेला फुटलेला आरसा असतो त्या घरामध्ये आजारपण येणे त्वचेच्या संबंधित आजार होणे आणि विविध प्रकारच्या अडचणी येणे हे निश्चित रूपाने होत असते त्यामुळे तुटलेला आरसा असेल किंवा त्याच्या मागील पारा असेल किंवा त्याचे पॉलिश केलेला आरसा असेल तर लवकरात लवकर बाहेर काढून त्या ठिकाणी नवीन आरसा आणून लावाल तर तुमच्या घरामध्ये कोणतीही कमी येणार नाही.
आणि त्यानंतर पुढील वस्तू आहे तुमचे जुने कपडे काही लोक अशी असतात ते आपल्या जुन्या वापरातील बरीचशी कपडे अगदी जशीच्या तशी घरात साठवून ठेवतात आणि त्याहूनही वाईट हे की जुने कपडे कोणा गरिबाला दान देणे पण खरे सांगायचे तर तो गरीब असला म्हणजे काय झालं जर त्यास द्यायचे असतील तर तुम्ही त्याला नवीन कपडे घेऊन द्या मग जरी ते स्वस्त दर्जाचे असले तरी काही हरकत नाही आणि तुमचे जुने कपडे भांडीवाल्याला देऊन टाका किंवा भंगारवाल्याला देऊन टाका किंवा फेकून द्या भक्त हो जे जुने कपडे कोणास देतात आणि हे समजतात की आम्ही दान केले तर आमच्या जीवनामध्ये कधीही समृद्धी येत नाही.
यासाठी नाही तुम्ही जुने वापरायचे आहेत आणि नाही तुम्ही जुने कोणाला द्यायचे आहेत तसेच तुमच्या घरातील रोजच्या वापराच्या भांड्याने जर अशी कोणती भांडी असतील ज्यांना कुठे चीर गेला असेल मग ती कोणत्याही धातूची असतील किंवा प्लास्टिक अथवा मातीची किंवा काचेची असो आणि जर तुम्ही त्यास आजही वापरत असाल तर तुमच्या जीवनात प्रगतीच्या मार्गात कधीच यश येत नाही आणि आपल्या भाग्यालाही असेच छेद व चीर पडू लागतात त्यामुळे अशा वस्तूंना आजच काढून टाका मग जरी तुमच्या घरात चार भांडी कमी झाली तरी चालतील थोड्याशा भांड्यांनी तुमचे घर चालवा पण अशा खराब झालेल्या भांड्यांना वापरून आपले घर चालवू नका त्यास आजच खाली करा आणि मग तुम्हीच पाहाल की तुमचे जीवन मग चमकू लागेल.
फक्त पुढील सातवी वस्तू आहे ती म्हणजे आपली चप्पल बरीचशी लोकं आपल्या चपलांना अगदी आपल्या पायाचे तळवे दिसे पर्यंत घासून घासून वापरत असतात पण भक्त हो अशा झिजून गेलेल्या चपलांचा जो वापर करत राहतो तर तो कितीही प्रयत्न करो त्याच्या जीवनात घरात कधीही शांती लाभत नाही चप्पल हे पूर्ण झिजू देऊ नका फाटण्यास देऊ नका तिच्या योग्यतेच्या काळापर्यंतच त्याचा वापर करावा जर तुम्हाला वाटत असेल की मी वारंवार चप्पल खरेदी करू शकत नाही तर भक्त हो तुम्ही अगदी कमी भावाच्या चपलांचे खरेदी करा पण जुन्या आणि पूर्णपणे घासून गेलेल्या चपलांचा वापर कमी करण्याचे कटाक्षाने टाळा अशाच चपलांना तुरंत आपल्या दारात बाहेर फेकून या नाहीतर आपल्या नशिबाला हे बरेचसे झिजावे लागते.
आणि मित्रांनो हो पुढील आठवी व शेवटची गोष्ट म्हणजे तुमच्या घरातील पीठ मीठ आणि तांदूळ भक्त हो सर्वात प्रथम मी आपणास सांगू इच्छितो की घरातील पीठ मीठ आणि तांदूळ या ज्या वस्तू आहेत त्या सर्व आपल्या शास्त्रानुसार आपल्या घरातील समृद्धीच्या वस्तू मांडल्या गेलेल्या आहेत त्यामुळे त्या वस्तूंना आपल्या घरातून पूर्णपणे खाली होण्यास देऊ नका काही लोकांना सवय असते की आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा घरातील राशन भरून पूर्ण डबे भरून ठेवायचे पण असे करू नका डब्यातील या वस्तू अर्धा डब्बा होताच पूर्ण भरून ठेवावे.
कारण असे केल्याने तुमच्या जिवणातील व घरातील मोठ्या प्रमाणात समृद्धी होण्यास किंवा वाढ होण्यास या वस्तू कार्य करत असतात शक्य झाल्यास या तीन वस्तूंचा साठा घरात करूनच ठेवावा डबे अर्धे होताच पुन्हा ते तुरंत भरून ठेवावे जोपर्यंत तुम्ही या वस्तूंना घरातून खाली होऊ देणार नाही तोपर्यंत तुमच्या घरातील लक्ष्मी कधीही खाली होणार नाही जसजसे तुम्ही यांना डब्यात भरत राहाल तसं तशी तुमच्या घरात लक्ष्मी भरत राहील भक्त हो जर तुम्ही या आठ वस्तू तुमच्या जीवनात सुधाराल तर तुमचे जीवनही उच्चस्तरीय सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल आणि यशस्वी होईल आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.