घराच्या छतावर टाका,चपातीचा एक तुकडा, 24 तासात चमत्कार पहा!

अध्यात्मिक

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण घरातील गरिबी नष्ट करण्यासाठी आपण दिवस-रात्र कष्ट करत असतात काहीजण स्वतःचा स्वतःचा व्यवसाय सुरु करतात तर काहीजण दुसऱ्याच्या कंपनीमध्ये कामासाठी जात असतात. पण तरीही अनेकांची गरीब परिस्थिती दूर होत नाही त्यांच्या घरात दारिद्र्य कायम राहते.मग असे लोक अनेक माध्यमावरून माहिती गोळा करून घरातील गरिबी दूर करण्यासाठी अनेक उपाय करत बसतात.

आज आपण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्या घरातील गरिबी दूर होण्यास मदत होईल. पण हा उपाय करताना आपण देवावर विश्वास ठेवायचा आहे आणि अगदी मनापासून हा उपाय करायचा आहे, आणि विशेष म्हणजे हा उपाय करत असताना आपल्याला कोणताही खर्च करावा लागणार नाही अगदी कमी खर्चात आपण हा उपाय घरच्या घरी करू शकतो.

मित्रांनो हा उपाय करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या कीज्यामुळे तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने कराल आपल्या हिंदू धर्मामध्ये दान धर्माला खूप महत्त्व आहे, आपले पुण्य जर वाढवायचे असेल तर दानधर्म शिवाय पर्याय नाही असेही म्हटले जाते आणि जर
आपण केलेली पापे नष्ट करायचे असतील तरीदेखील दानधर्म करण्याचा उपाय आपल्याला सांगितला जातो याच दानधर्म मध्ये काय अन्नदाना ला मोठे महत्त्व आहे.

आपण अनेकदा पाहतो की अनेक मोठमोठे लोक तसेच श्रीमंत व्यक्ती मोठ्या प्रमाणात दानधर्म करत असतात भुकेलेल्या व्यक्तीला अन्न दिल्याने आणि दानधर्म केल्याने आपल्या कुंडलीतील दोष दूर होण्यास जास्त मदत होते तसेच आपल्या घरांमध्ये सुख-समृद्धी नांदते व घरामध्ये पैशाची कधीच अडचण निर्माण होत नाही चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे हा प्रभावी उपाय.

हा उपाय आपण घरच्या घरी करू शकतो तसेच हा उपाय आपण आठवडाभर आतील कोणत्याही दिवशी करू शकतो आणि जर दररोज न चुकता हा उपाय केला तर त्याच्या जास्तीत जास्त फायदा आपल्याला दिसून येईल, हळू हळू आपल्या घरातील गरिबी नष्ट होण्यास सुरुवात होईल हा उपाय करण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये जेव्हा स्वयंपाक करत असतो त्यावेळी सर्वात आधी केलेली चपाती किंवा भाकरी बाजूला काढून ठेवायची आहे.

त्यानंतर स्वयंपाक करत असताना सर्वात आधी केलेली चपाती घेऊन त्या चपातीचे व्यवस्थित या चार भाग करायचे आहेत, व त्यातील पहिला तुकडा गाईला खाऊ घालायचा आहे, जर ती गाय देशी असेल तर अति उत्तम पण देशी गाय नसेल तर इतर कोणत्याही गाईला तुम्ही हा पहिला तुकडा खाऊ घालू शकता, आपल्या हिंदू संस्कृती मध्ये गाईला माता मानले गेले आहे कारण गायीच्या पोटात 33 कोटी देव वास करत असतात त्यामुळे हा चपाती चा तुकडा चारत असताना गाईला नमस्कार करा.

त्यानंतर त्या चपातीचा दुसरा तुकडा घेऊन काळया कलरच्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे, यामुळे आपल्या वर असणारा शनि देवतांचा त्रास कमी होतो व राहु दोष असेल तरी तोही कमी होण्यास मदत होते, काळया कुत्र्याला चपातीचा किंवा भाकरीचा तुकडा खाऊ घातल्याने आपल्या कुंडलीतील शनी दोष कमी होतो तसेच राहु दोष किंवा केसू दोष आपल्या कुंडलीमध्ये असतील तर तेही ह्या उपायामुळे हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते.

आणि तिसरा चा तुकडा आहे तो कावळयांसाठी आपल्या घराच्या छतावर ठेवायचा आहे. जे आपले पूर्वज आहेत आणि यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचा आशीर्वाद देखील आपल्या यशासाठी आवश्यक असतो त्यामुळे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कावळ्याच्या रूपाने तो आपल्या पूर्वजांना आपण खाऊ घालायचा आहे. हा कावळ्यांना खाऊ घालायचा तुकडा आपण आपल्या गच्चीवर किंवा घराच्या छतावर ठेवायचा आहे.

आता उरलेला आणि चौथा चपातीचा तुकडा आपल्या जवळ असणाऱ्या चौकांमध्ये जिथे चार किंवा तीन रस्ते एकत्र येतात त्या चौकांमध्ये हा शेवटचा तुकडा टाकायचा आहे. पण ज्यावेळी आपण हा चौथा तुकडा चौकांमध्ये टाकत असतो तेव्हा शक्यतो कोणासोबतही न बोलता हा तुकडा त्याठिकाणी टाकून गपचूप घरी परत यायचे आहे, मागेही वळून पाहायचे नाही आणि जर हा चपाती चा तुकडा चौकामध्ये टाकताना आपल्याला कोणी पाहिले तरी त्याचा जास्त विचार करत बसू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *