घराची भरभराट किंवा घरामध्ये बरकत येण्यासाठी खास वास्तु उपाय

वास्तूशास्त्र

नमस्कार मित्रांनो,

ओम नमो नारायणा मित्रांनो कधी कधी आपल्या हातातून अशी काही कामे घडतात की, त्यामुळे आपलं भाग्य दुर्भाग्यत रूपांतरीत होत. आणि सोबतच धन हानी होते म्हणजेच पैसा घराबाहेर जाऊ लागतो, घरातली सुखसमृद्धी समाप्त होते.

आज आपण आपल्या घरासंबंधी अशा काही गोष्टी पाहणार आहोत की, ज्यामुळे भाग्य दुर्भाग्यत बदलण्यासाठी च्या गोष्टी कारणीभूत असतात किंवा अस झालेलं असेल तर त्यातून आपल्याला मुक्ती मिळू शकेल. या समस्या उभ्या राहिलेल्या आहेत पैसा येत नाहीये सुखसमृद्धी येत नाहीये तर,

त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी या काही गोष्टी अत्यंत उपयोगी ठरतील आणि या गोष्टींचं पालन जर आपण एक नियम म्हणून जर करू लागलात आपल्या घरात तर आपल भाग्यसुद्धा चमकून जाईल. आपलं भाग्य तुम्हाला साथ देऊ लागेल.

मित्रांनो पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट सुर्यास्त झाल्यानंतर म्हणजे सूर्य मावळ्यानंतर अगदी कुणालाही म्हणजे तुमच्या शेजारी पाजारी असतील, अगदी तुमची भावकी असेल भाऊबंदकी असेल तर अशा लोकांना सुद्धा आपल्या घरातील दूध असेल, दही असेल, कांदा असेल या वस्तू चुकूनही देऊ नका.

या वस्तूचा थेट संबंध आपल्या घरातील सुख-समृद्धीशी असतो. आणि जेव्हा या वस्तू आपण दुसऱ्याला देतो तेव्हा आपल्या घरातल्या सुख समृद्धी या वस्तूसोबत निघून जाते. दुसरी गोष्ट तुम्ही ज्या ऑफिसमध्ये काम करता किंवा एखादा कारखाना असेल, फॅक्टरी असेल, दुकान असेल,

तर तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी महिन्यातून अगदी कोणत्याही दिवशी न चुकता मिठाई सोबत घेऊन जा आणि ही मिठाई आपला बॉस असेल, आपले सहकार्य असतील त्यांच्या बरोबर वाटून खा. मित्रांनो हा छोटासा उपाय आपल्या जीवनात प्रगतीचे द्वार खुले करतो.

प्रगतीचे दरवाजे उघडतात. अगदी साधी गोष्ट आहे आपण करून पहा आपल्याला फरक जाणवू लागेल. महिलांसाठी एक गोष्ट घराचा मुख्य दरवाजा असतो. अनेकदा त्या मुख्य दरवाज्याच्या पाठीमागे किंवा समोरच कचराकुंडी ठेवलेली असते. कचऱ्याची पेटी ठेवलेली असते. आपण डजबिन म्हणतो.

मित्रांनो आपल्या घरातील सगळा कचरा की, जो मोठ्या प्रमाणात मनात निगेटिव्ह एनर्जीचा स्त्रोत असतो. असा कचरा जेव्हा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळच असतो तेव्हा आपल्या घरात येणारी सकारात्मक ऊर्जा त्याच ठिकाणी थांबते किंवा नष्ट होते.

आणि मग आपल्या घरात हळूहळू नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावाने अशांतीच वातावरण निर्माण होत आणि अशा घरात माता लक्ष्मी टिकत नाही. आणि म्हणून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी आपण कशाप्रकारे कचरा पेटी ठेऊ नका. शत्रुत्वसुद्धा वाढण्यास ही गोष्ट कारणीभूत आहे.

आणि अनेकदा आपले शेजारी पाजारी किंवा आपले जवळचे नातेवाईक आपल्याशी शत्रुत्व भावनेने वागतात. तर अशावेळी शत्रुत्व वाव कमी करायचा असेल तर ही चूक आपण सुधारायला हवी. सकाळी उठल्यानंतर एक खूप चांगली गोष्ट आपण करू शकता आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढेल.

कोणत्याही देवी देवतेचे भजन असेल किंवा एखादा मंत्र असेल तर तुम्ही स्वतः म्हटलं तरी उत्तम आहे किंवा तुम्ही मोबाईल वरती किंवा टीव्ही असेल तर हा मंत्र लावून ठेवाला मित्रांनो खूप चांगले रिझल्ट्स मिळत. तुम्ही करून पहा अगदी 5 ते 6 दिवस एका आठवड्यात तुम्हाला दिसेल की,

घरात सुख शांती निर्माण झालेले आहे प्रगतीच्या दिशेने ततुमची वाटचाल सुरू आहे. कारण हे जे मंत्र असतात मित्रांनो या मंत्रणांमध्ये खूप सारी शक्ती असते ताकद असते आणि नकारात्मक ऊर्जा यामुळे दूर निघून जाते.बऱ्याच वेळा अस होत की,

घरामध्ये माता लक्ष्मी टिकत नाही आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेकजण अनेक प्रकारचे उपाय करतात. मात्र उपाय फलतृप्त होत नाही. अशावेळी महिन्यातून एक दिवस विशेष करून शुक्रवारीचा दिवस किंवा मंगळवारचा दिवस आपण खडीसाखर घातलेली खीर बनवा.

खीर बनवायची आहे तांदळाची बनवा, कोणतीही बनवा मात्र त्यामध्ये खडीसाखर टाका. साखरेच्या ऐवजी खडीसाखर आणि अशी ही खीर आपण लक्ष्मी मातेस प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे. भोग लावायचं आहे. आणि नंतर कुटुंबातील सर्वांनी मिळून खायचं आहे.

मित्रांनो कुटुंबातील सदस्यातील प्रेम वाढीस लागत आणि सोबतच माता लक्ष्मीचा सुद्धा वास आपल्या घरात हळूहळू निर्माण होऊ लागतो. जेवण करताना एक महत्त्वाची गोष्ट अनेक जण ज्या ठिकाणी झोपतात त्याच, मग कधी कधी टीव्ही चालू असते आणि तुम्ही तुमच्या अंथरुणावर बसून अशाप्रकारे काहीतरी वस्तू खात असता.

पॉपकॉर्न वगैरे किंवा अनेकजणांना गादीवरती बसून जेवण करण्याची सवय असते. मित्रांनो ही सवय आपल्या घरात कर्ज वाढवते, उधारी वाढवते, घरातील लोकांवरती कर्ज वाढू लागत. आणि म्हणून तर कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर ही सवय आपण सोडायला हवी.

मित्रांनो आज एक अत्यंत चांगला तोटका मी सांगणार आहे उपाय सांगणार आहे की, रात्री झोपण्यापूर्वी आपल्या किचनमध्ये आपण नक्की आपण काय ठेवायचं आहे. मित्रांनो ही एक वस्तू किचनमध्ये किंवा आपल्या बाथरूम मध्ये ठेवली तर,

घरात खूप मोठ्या प्रमाणात जे भाग्य आहे ते उजळू लागत, ते भाग्य साथ देऊ लागत. मित्रांनो ही वस्तू कोणती तर, पाण्याने भरलेली बादली. पाण्याने जी भरलेली बादली आहे बकेट आहे ती आपण आपल्या किचनमध्ये, कधी करायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी किचनमध्ये किंवा

आपलं जे बाथरूम आहे त्या ठिकाणी किंवा दोन्ही ठिकाणी तुम्ही ठेऊ शकता. मित्रांनो तुमच्यावरती कर्ज असेल, कर्जातून मुक्ती मिळेल, कर्ज खूप लवकर निल होईल. आणि सोबतच जीवनामध्ये प्रगतीचे नवनवीन दरवाजे सुद्धा खुलतील. अगदी करून पहा खूप छोटासा उपाय आहे पण खूप प्रभावी अशाप्रकारचा हा उपाय आहे.

अजून एक गोष्ट तुम्ही ज्या किचनमध्ये हा उपाय करता आहात त्या किचनमध्ये रात्री झोपताना खरकटी भांडी पडता कामा नयेत. कारण ही खरकटी भांडी निगेटिव्ह एनर्जीशी रिलेटिड असतात. आणि मी यापूर्वी सांगितले की, ज्या किचनमध्ये कशाप्रकारे खरकटी भांडी पडलेली असतात,

रात्रभर त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीच वास करत नाही. तर कधी कधी आपल्याला बरीशी काम असतात किंवा इमर्जन्सी असते आणि अशा प्रकारे भांडी धून ठेवता येत नाही. त्या वेळी कमीत कमी आपण फक्त पाण्याने जरी ही खरकटी भांडी धून त्या ठिकाणी ठेवून दिली तरी चालेल,

सकाळी तुम्ही त्याला व्यवस्थित घासून पुसून स्वच्छ करू शकता जेणे करून पैशांची हानी होणार नाही धन हानी होणार नाही. घरामध्ये कोळ्याची जाळी झालेले असतील मी अशा गोष्टी सांगतोय की, ज्या तुमचं सगळं काही व्यवस्थित चालेल आहे आणि त्यामध्ये रुकावट पैदा करतात.

त्यामध्ये बाधा बनतात, दुर्भाग्यमध्ये त्याच रूपांतर होऊ लागतं. सगळं काही चांगलं चालेल असत अचानक वाईट होऊ लागत आणि म्हणून जर अस घरात अशा प्रकारे जाळी झालेली असतील, कोळ्याची जाळी किंवा खूप सारी घाण साठलेली असेल,

आपण भंगार साहित्य गोळा करून ठेवतो एक दिवस वेळ काढून सगळं साहित्य भंगारात विकून टाकावी किंवा त्याला विशिष्ट जागी आपण ठेवावी. घराच्या बाहेर विशिष्ट अशी जागा करू शकता किंवा घरातच जरा व्यवस्थित आपण ठेवले तर,

मित्रांनो या भंगार वस्तूमधून जी निगेटिव्ह एनर्जी सातत्याने आपल्या घरात निर्माण होत असते तिच्यापासून आपला बचाव होईल आणि देवघरासंबंधी एक छोटासा नियम आपल्या देवघरामध्ये एक पाण्याने भरलेला कलश किंवा एक तांब्या धातूपासून बनलेला तांब्या ज्यामध्ये ताब्याभर पाणी आपण अवश्य ठेवत चला.

मित्रांनो खूप चांगला उपाय आहे तोटका आहे. आता ठेवायचा कुठे? तर आपल्या मंदिरात जो ईशान्य जो कोपरा आहे, ईशान्य म्हणजे कोणता पूर्व दिशा आणि उत्तर दिशा याच्यामधली जी दिशा आहे. त्या कोपऱ्यात आपण हा कलश ठेवला पाण्याने भरलेला तांब्या जर ठेवला तर,

मित्रांनो कुटूंबातील सर्व सदस्यांसाठी ही गोष्ट अंत्यंत शुभदायक मानली जाते. तर मित्रांनो आपल्या घरासंबंधी या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. मला आशा आहे की, तुम्ही या गोष्टीचे पालन कराल, आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नादु लागेल अशी मनोकामना मी ईश्वरचरणी व्यक्त करतो.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *