फक्त 3 वेळा करा हा उपाय , उधार दिलेले पैसे परत मिळतील…

अध्यात्मिक

बऱ्याचदा काही अडचणीच्या वेळी आपण एकमेकांना मदत करतो. ही मदत आर्थिक स्वरूपात सुद्धा असते. काही वेळेस आपण पैसे उधार देतो किंवा परत देण्याच्या मुदतीवर उसने देतो व आपल्या काही व्यक्तींना अशी मदत करतो. कारण जीवनात अडचण ही सर्वांनाचं असते त्यामुळे आपण चांगल्या भावनेने मदत करतो परंतु काही लोक जे बोलतात तसे वागत नाहीत.

काही लोक पैसे घेताना चांगले वागतात, मुदत मागून गयावया करतात पण परत करायच्या वेळी टाळाटाळ करतात काही जण तर गायब होतात. मग अशा वेळी माणूस मोठ्या संकटात सापडलेला असतो कारण जोर-जबरदस्तने पैसा मागितले की नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. म्हणून त्यासाठी उधार दिलेले पैसे आपल्याला काही दिवसातच मिळतील , यासाठी एक जालीम उपाय करायची गरज आहे.

आपण एखाद्याला त्याच्या संकटाच्या वेळी पैसे उधार देतो परंतु जेव्हा हे पैसे परत देण्याची वेळ येते तेव्हा ती व्यक्ती 100 कारणे सांगते. यामुळे मानसिक तणाव सहन करावा लागतो. पैसा तर परत मिळत नाही पण उलट नातेसंबंध खराब होतात, अशा वेळी अनेक प्रयत्न करून देखील समोरची व्यक्ती तुमचे उदाहरण घेतलेले पैसे परत करत नसेल तर हा उपाय केल्यास या उपायामुळे तुमचे पैसे ती व्यक्ती स्वतःहुन देईल..

आपल्याला हा उपाय गोपीचंदनाचा करायचा आहे. कारण तो खूप परिणामकारक ठरतो . तसेच हा प्रयोग प्रदोषव्रत ज्या दिवशी असते त्याच दिवशी केल्यास अधिक चांगल्या पद्धतीने प्रभावी ठरतो. तुम्ही फक्त तीन ते चार प्रदोष करा आणि याचा तुम्हाला प्रभाव नक्कीच दिसेल. हा उपाय स्कंदपुराणात सांगितला आहे.

त्यामुळे याचा नक्कीच फायदा होईल. तसेच प्रदोष व्रत हे प्रत्येक महिण्यातून दोन वेळा येत असते. प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते. सर्वात आधी हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक बेलपत्र गरजेचे आहे. हे बेलपत्र प्रामुख्याने 3 पानाचे असावे. यामधील आपल्याला मध्य भागातील पानाचा वापर करायचा आहे. या बेलपत्राच्या जे मध्यभागी पान असते त्या पानावर गोपी चंदनाचा लेप लावायचा आहे.

आपल्याला हे गोपी चंदन लावलेल्या बेलपत्राचे पान उजव्या तळहातावर मध्यभागी ठेऊन आणि आपल्या मनातल्या मनात आपले उधार घेतलेले पैसे त्या लोकांनी लवकर परत करावेत अशी इच्छा व्यक्त करून , तळहातावर घेतलेल बेलपत्र शिवलिंगावर चिकटवायचा आहे आणि त्यानंतर एक तांब्या जल त्या शिवलिंगावर अर्पण करायचा आहे कारण महादेव हे या सृष्टीचे पालनकर्ता आहेत.

शिवलिंगावर हे बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय या प्रभावी मंत्राचा सतत जप आपल्याला करायचा आहे . फक्त तीन ते चार प्रदोष हा उपाय करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला याचा प्रभावी परिणाम नक्कीच जाणवेल. तुम्हाला नक्कीच सकारात्मक उर्जा जाणवेल, तुम्ही उधार दिलेले पैसे नक्कीच परत मिळतील ती व्यक्ती स्वतःहुन पैसे तुमच्याकडे आणून देईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *