नमस्कार मित्रांनो,
सकाळी उठल्यानंतर महिलांनी आपल्या घरातील मुख्य दरवाजा उघडल्याबरोबर हे एक काम नक्की करा. खर तर ही एक सवय लावा. आपल्या जीवनात एक अमुलाग्र बदल घडेल. मातालक्ष्मीची कृपा बरसेल. घरातील वादविवाद भांडणे संपतील. आरोग्य चांगले राहील.
जो काही तुम्ही नोकरी करता, व्यवसाय करत आहात, त्या प्रत्येक ठिकाणापासून धन, पैसा येऊ लागेल आणि भरभराट होईल. मात्र एक सवय म्हणून हे एक काम आपण दररोज महिलांनी करावे. तसेच तुमच्या जीवनात वारंवार संकटे येत आहेत किंवा शनी दोष आहेत.
एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत आहे. तर तो त्रास सुध्दा या छोट्या छोट्या उपायाने नक्की दूर होतो. खरे तर वास्तुशास्त्रात आपल्या घराचे मुख्य दरवाजाला फार महत्त्व आहे. आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा आकाराने मोठा असावा.
या मुख्य दरवाजानेच माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते म्हणून वास्तुशास्त्रानुसार योग्य स्थिती, योग्य दिशा असणे फार महत्वाचे असते.
सकाळी उठल्यानंतर महिलांनी आपल्या दरवाजाचा जो उंबरठा आहे त्यावरती थोडेसे गंगाजल अवश्य शिपंडा. हे गंगाजल घरात ठेवणे खूप पवित्र, शुभ मानले जाते. तर असे गंगाजल दररोज उठल्यानंतर महिलांनी उंबरठयावर शिपंडावे. ते गंगाजल पूजेच्या तांब्यात घ्या. गंगाजल नसेल तर साधे पाणीदेखील वापरू शकता.
हा छोटा उपाय वास्तूचे पावित्र्य टिकून ठेवते. आपल्या वास्तूमध्ये सुखसमृद्धीचा निरंतर प्रवेश होतो. आणखी एक गोष्ट दररोज सकाळी झाडलोट करण्यापूर्वी आधी पाणी शिपंडा आणि त्यानंतर झाडलोट करा. लक्षात घ्या कितीही मोठी बाधा कितीही मोठे टोटके या छोट्याशा उपायाने त्याचा प्रभाव समाप्त होतो.
जर दररोज करणे शक्य नसेल तर कमीतकमी शनिवार आणि रविवार या दोन दिवशी हा उपाय नक्की करा. फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडे खडे मीठ टाकून त्या पाण्याने फरशी पुसावी. मात्र हा उपाय फक्त गुरुवार वगळून इतर सर्व दिवशी करावा. आणि सोबत हळद त्या पाण्यात टाकू शकता.
हळद जर पाण्यात टाकली तर आपल्या कुंडलीतील गुरू ग्रह मजबूत बनतो. धनप्राप्ती होते. तुम्ही कोणतेही काम करा त्या कामातून भरपूर पैसे येतात. तसेच घरातील मोठ्यातमोठी बाधा, नकारात्मक ऊर्जा, संकटे दूर होतात. मित्रांनो, अजून एक महत्वाची गोष्ट करा. आपल्या मुख्य दरवाजाला सोमवारच्या दिवशी आंब्याच्या पानांचे तोरण लावा.
आपल्या घरातील लोकांचे आरोग्य त्यामुळे चांगले राहते. आणि गुरुवारचा दिवस आला की, अशोकाच्या पानांचे तोरण मुख्य दरवाजाला लावा. धनप्राप्तीचे नवनवीन योग्य निर्माण होतात. जे तोरण सोमवारी लावले ते गुरुवारी बदला, आणि जे गुरुवारी लावलेले तोरण सोमवारी बदला.
तोरण बदल्यानंतर कोणत्याही गाईला, पशुला हे खाऊ घालू शकता. परंतु ते तोरण सुखल्यानंतर ठेवू नका. जर तुम्ही तसेच ठेवले तर निगेटीव्ह एनर्जी निर्माण होते. आणखी एक महत्वाची गोष्ट अनेकाच्या घराच्या चौकटीवर श्री गणेशाची मूर्ती दिसून येते.
तुम्ही जेव्हा आपल्या मुख्य दरवाजाच्यासमोर श्री गणेशाची मूर्ती बसवता तेव्हा त्याची पाठ ही घराच्या आत होते. परिणामी घरातला पैसा विनाकारण बाहेर पडू लागतो. दरीद्रीता, कंगाली येऊ लागते. तर मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार श्री गणेशाची प्रतिमा घराच्या आतमध्ये बसवा.
आणि सोबतच मोरपंखसुध्दा लावा. मोठ्यातमोठा वास्तूदोष त्यामुळे दूर होतो. आणि शेवटची गोष्ट शत्रूमुक्तीसाठी. एखादी व्यक्ती वारंवार त्रास देते त्यासाठी आपल्या घराच्या अंगणात एक रुईचे झाड अवश्य लावा. पांढऱ्या रंगाचे रूईचे झाड लावा. शत्रूमुक्तीसाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे. शत्रू तुम्हाला कधीच त्रास देणार नाही.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.