नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आयुष्य सुखी समृद्धी व्हावे, वा ई ट घटना घडू नयेत, सर्व अडचणी दूर व्हाव्यात, आपल्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण व्हाव्यात, आपली रोजंदारी, आपला नोकरी, धंदा व्यवसाय यामध्ये आपणाला हव्या तशा गोष्टी घडाव्यात क र्ज असेल तर ते तात्काळ फिटले जावे अथवा माफ व्हावे अशा अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये असतात.
आणि त्या पूर्ण होण्यासाठी आपण अ ने क देवांना पुढे वेगवेगळे नवस बोलतो. दा न ध र्म करण्याविषयी बोलून येतो. विविध मागण्या मागून येतो.
ह्या अशा जरी गोष्टी असल्या तरी एक असा शब्द आहे की जो स्वामी समर्थ महाराजांकडे म्हटल्यास आपली सर्व कामे तात्काळ मार्गी लागतात तसेच आयुष्य सुखकर होण्यास मदत होते. यश तुमच्याकडे खेचून येते.
असा कुठला शब्द?
मित्रांनो, जाणून घेऊया असा कुठला शब्द आहे की ज्यामुळे स्वामी समर्थ महाराज आपल्या इच्छा लागलीच पूर्ण करतात. आपणाला आशीर्वाद देतात आणि आपली कामे मार्गी लागतात धन दौलतीची बरसात होते.
हा असा कोणताही मोठा किंवा इतर भाषेतील अवघड असा शब्द नाही आपण इतर सर्व शब्द बोलतो मात्र महाराजांपुढे हाच शब्द नेहमी बोलायचं विसरुन जातो किंवा काही जणांना माहितीच नसतं.
मग मित्रांनो आलाय ना आपल्या डोक्यात हा विचार की असेल कुठला हा शब्द? मित्रांनो हा शब्द आहे ‘धन्यवाद’. तुम्हाला वाटेल की असं कोणी महाराज किंवा देवांना धन्यवाद देता का? असं वाटणेही तुमचं साहजिकच आहे.
महत्व या शब्दाचे किती आणि काय महत्त्व आहे आणि ते कधी म्हणावा ते म्हणण्याची विशिष्ट वेळ कोणती आणि म्हणताना काय करावे त्या वेळची स्थिती कशी असावी, याचबरोबर इतरही माहिती जाणून घेऊया…
मित्रांनो आपण नेहमी स्वामी समर्थांची प्रार्थना करतो मनोभावे श्रध्देने सेवा करतो. या पश्चात आपले आयुष्य सुखी होण्यासाठी तसेच येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी, आपल्या लेकरांना सुखी ठेवण्यासाठी आणि घरातील ज्येष्ठांची तब्येत ठीक राहण्यासाठी आपण अनेक देवांना नवस ही बोलतो.
यावेळी दानधर्म बद्दल बोलून येतो. दानधर्म करणे केव्हाही मानवजातीला चांगलीच आहे. दानधर्म केल्याने करणाऱ्या माणसाला सर्व कामात यश लाभत असते ही गोष्ट खरी आहे. तसे बोलून आपण आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर दानधर्म ही करतो मात्र आपण देवाला किंवा स्वामी समर्थ महाराजांना धन्यवाद हा शब्द म्हणायचे विसरतो.
कधी म्हणायचा असतो हा शब्द?
मित्रांनो, हा शब्द आपल्याला आपल्या कार्याची पूर्ती झाल्यानंतर तसेच आपली काम पूर्ण मार्गी लागल्यानंतर स्वामी समर्थ महाराजां समोर बसून पूर्ण कृतज्ञ भावनेने धन्यवाद असा शब्द बोलावयाचा असतो.
मात्र ज्या गोष्टी तुम्ही मागून त्या कामासाठी प्रयत्न करत आहात आयुष्य सुखी होण्यासाठी झटत आहात ती सर्व कार्य करताना पूर्ण मन लावून आणि सर्व कार्य पूर्ण होणारच या आत्मविश्वासाने करावीत.
आणि हे कार्य पूर्ण होताच महाराजांपुढे धन्यवाद हा शब्द बोलावा. मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांना पुढे हा शब्द बोलण्याचे इतरही खूप फायदे आहेत.
उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण
मित्रांनो समजा जर आपल्या कामातील एक भाग म्हणून तुम्ही दिवसाला 100 रुपयांची कमाई करत आहात.तर आज या तुमच्या कमाईने तुम्हाला 100 रुपये मिळत आहेत याबद्दल तुम्हाला कृतज्ञ असले पाहिजे आणि याबद्दल हि जेव्हा तुम्ही हे कार्य करून तुमच्या हातात हे तुमचे 100 रुपये मिळतात त्या वेळी कृतज्ञ भावना ठेवून आपण धन्यवाद म्हटलं पाहिजे.
मनात त्याअर्थाने भाव असले पाहिजेत. असे केल्याने महाराज हे आपण समाधानी आहोत म्हणून आपले आजचे 100 रुपये उद्या 200 तर लवकरच 400 आणि बघता बघता हजार रुपया पर्यंत कधी पोहोचले हे तुम्हाला कळणार ही नाही.
या उलट तुम्ही माझ्या आजच्या कामाचे मला फक्त 100 रुपयेच मिळाले. म्हणून नाराज झालात तर उद्या हेच 100 रुपये कमविण्यासाठी तुम्हाला आजच्यापेक्षा उद्या आणखीन अडचणींना तोंड द्यावे लागेल. तेव्हा हा शब्द तसेच ही भावना कृतज्ञतेची भावना आपणाकडे नेहमी असली पाहिजे.
ही भावना बाळगा
मित्रांनो अशी भावना सातत्याने बाळगल्यास तसेच कृतज्ञ ते सह देवासमोर धन्यवाद हा शब्द आपल्या कार्यपूर्ती नंतर बोलत राहिल्यास नक्कीच आपली सर्व कार्ये मार्गी लागतील. आपल्या धंद्यामध्ये तेजी येईल. घरात धन दौलत भरून जाईल. मुलेबाळे सुखी राहतील. वृद्धांची तब्येत चांगली राहून त्यांचे तुम्हाला आशीर्वाद मिळत राहतील. अशा या धन्यवाद या एका शब्दाचे महत्त्व आहे.
अशी अनेक उदाहरणे देता येतील की समजा आपले काही ठिकाणी पैसे येणे असतील. काहींना वैद्यकीय अडचणी असतील. तर काहींना नोकरीमध्ये बढती किंवा अडचणींना तोंड द्यावे लागत असेल, तसेच पगारवाढीचा विषय असेल. अशा अनेक कारणांवर हा उपाय आपण होऊन नक्कीच उपयोगी पडेल.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.