आपल्या हिंदू धर्मात माता तुळशीला अतिशय पूजनीय मानले जाते. तसेच तुळशी वृंदावन हे आपल्या घराची शोभा वाढवत असते. तसेच वातावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करते. म्हणून प्रत्येक हिंदु धर्मातच्या घरात तुळस असतेच.कारण ते घराला नकारात्मक गोष्ट पासून दूर करण्यासाठी मदत करते.तुळशी चे आयुर्वेदिक पण गुणधर्म आहेत. जर आपण माता तुळशी जवळ काही गोष्टी ठेवल्या आपल्या घरात सुख आणि वैभव नक्की येते.
यामध्ये सर्वप्रथम म्हणजे तुळशी जवळ स्वस्तिक काढावे. कारण हे हिंदु धर्मात हे अत्यंत शुभ आणि सकारात्मक प्रतीक मानले जाते. कारण ज्या ठिकाणी स्वस्तिक असते त्या ठिकाणी सर्व देवीदेवतांचा निवास असतो. जेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मक गोष्टीची वाढ होते तेव्हा तुमची तुळस वाळण्यास सुरू होते. मग अश्या वेळी तुम्ही या तुळशी जवळ हे स्वस्तिक काढा.
त्याने घरातील नकारात्मक विचार नाहीसे होतात. स्वस्तिक काढताना कुंकूचा वावर करा, तेव्हा “ओम नमो भगवते वासुदेवाय नमः”, हा चमत्कारिक मंत्रचा जप करा. आजकाल आपण पाहतो की, काही लोकांना मुले नाहीत त्यांनी त्या स्त्रीने तुळशीजवळ बसुन भागवत गीता वाचावी आणि तुळशी पुढे संततीचे इच्छा व्यक्त करावी.
जेव्हा तुम्ही तुळशीचे रोपटे आणता, तेव्हा मनोभावे हात जोडुन म्हणा की, हे माता तुळशी तुला आम्ही आमच्या घरी आमंत्रीत करत आहोत. तसेच असे म्हणतात की, माता तुळशीची रोपटे शक्यतो गुरुवारी लावावे. तसेच अनेक लोक आपल्या तुळशी वृंदावन शिवलिंगची पूजा करतात त्याने माता तुळशी नाराज होते.
त्यामुळे त्याच्या ऐवजी शालीग्रामची पूजा तुळशी वृंदावन करावी कारण ते शाळीग्राम हा माता तुळशीचा पती आहे. तसेच दिवाळीनंतर हा शालीग्रामचा दगड तुलसी विवाहाला स्थापन करावा. त्याने आपल्या जीवनात आनंद आपोआप येतात. काही जणांना तणाव असतो त्याने आपली झोप पुर्ण होत नाही त्यासाठीआपण तुळशीची रात्री झोपताना एक ग्लास पाण्यात टाकुन झाकुन ठेवावे.
सकाळी उठल्यावर हे पाणी पिण्यास विसरू नये. झोपे बरोबर तुमचे आरोग्य हे चांगले राहते आणि तिसरी वस्तु म्हणजे रोज संध्याकाळी तुळशी वृंदावनत गाईच्या तुपाचा दिवा लाववा, त्याने सर्व देविदेवता प्रसन्न होतात. याचा बरोबर काही नियम हे पाळत जावा. त्यात रोज सकाळी तुळशीस जल अर्पण करावे आणि मात्र सायंकाळी करु नये.
तुळशी वृंदावन जवळ साफ-सफाई करावी आणि अधार्मिक गोष्टी तुळशीजवळ ठेऊ नका. वरील सर्व गोष्टी किंवा उपाय केल्यास तुम्हाला माता तुळशी आणि या जगाचे पालनकर्ता श्री भगवान विष्णूची कृपा तुमच्या परिवारावर होते. तसेच काही नियम ही पळत चला. त्याने तुमच्या घरावर धनलाभ आणि सुख समृद्धी नांदेल.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.