ओम नमः शिवाय, 15 ऑगस्ट रोजी श्रावण तिसरा सोमवार आलेला आहे. या दिवशी शिवामूठ मूग असणार आहे. तर आपण शिवलिंगावर ती एक मुठ मूग अवश्य अर्पण करा आणि त्याचबरोबर आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठीच हे खास उपाय या दिवशी आपल्याला करायचा आहे. जर तुम्ही भरपूर उपाय केले आहेत, पण त्याचा फायदा झाला नाही.
घरातील आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे, पैसा येण्याचे मार्ग बंद झालेले आहेत याशिवाय, नोकरी व्यापार व्यवसायात बरकत होत नाही तर श्रावणातील या तिसऱ्या सोमवारी तुम्ही हा खास उपाय अवश्य करा. काही आर्थिक अडचणी आहेत, समस्या आहेत त्या दूर होतील आणि व्यापारात तुम्हाला सफलता मिळेल
आणि नोकरी करत असाल तर तिथे देखील प्रमोशन होईल आणि पैसे येण्याचे वेगवेगळे मार्ग राहतील. तसेच घरामध्ये सुख-शांती आणि समाधान येईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक बेलपत्र आणि लाल चंदन होय. तर बेलपत्र हे अखंड असावे, कारण तुटलेले किंवा खंडित झालेले बेलपत्र आपल्याला घ्यायचे नाही.
बेलपत्राची तीनही पाने अखंड असतील, तुटलेली वगैरे नसतील, तर असच बेलपत्र आपल्याला या उपायासाठी वापरायचा आहे. त्याचबरोबर लाल चंदन देखील आपल्याला लागणार आहे. कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये हे लाल चंदन तुम्हाला भेटून जाईल, तर हे लाल चंदन आपल्याला उपायासाठी वापरायचा आहे.
तसेच हा उपाय तुम्ही मंदिरात जाऊन करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावर देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला जसं शक्य असेल तर अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. एका वाटीमध्ये आपल्याला लाल चंदन घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे. मात्र गंगाजल उपलब्ध नसेल तर शुद्ध पाणी तुम्ही याच्या टाकायचा आहे आणि त्याचं लेप बनवायचा आहे.
असा या लेपाने आपण शिवलिंगावर ती ओम काढायचे आहे. आपल्या बोटाने शिवलिंगावर ते आपल्याला हे ओम काढायचा आहे आणि त्याचा म्हणजे आपण शिवलिंगावर खाली त्रिकुंड बनवायचे आहे आणि त्यानंतर यावरती एक बेलपत्र चिटकवायचे आहे. तर बेलपत्र हे उलट्या बाजूने चिकटवायचे आहे,
म्हणजे सर्व बाजूंनी आहे ती शिवलिंगाला करायचे आहे, अशा प्रकारे बेलपत्र आपल्याला या शिवलिंगावर अर्पण करायची आहे आणि आपल्या इच्छा-आकांक्षा आहे त्यांना बोलून दाखवायचे आहे. तुम्हाला 15 दिवसांमध्ये तुम्हाला याचा रिझल्ट पाहायला भेटेल. तुमच्या जीवनात काही अडचणी-संकटे समस्या दूर होतील. घरामध्ये धनामध्ये वाढ होईल, असा देखील कृपा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहील.
घरामध्ये येणारा पैसा टिकून राहील वायफळ खर्च होणार नाही. बऱ्याच वेळा आपल्या घरात पैसा येतो पण तो विनाकारण खर्च जातो. त्यामुळे विनाकारण एखाद्या गोष्टीमध्ये आपल्या घरातील पैसा खर्च होऊन जातो तर आपण आपल्या घरामध्ये टिकून राहावा वायफळ खर्च कमी व्हावा यासाठी देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्ही देखील श्रावणातील तिसऱ्या सोमवारी हा उपाय अवश्य करा..