10 मार्चपासून सुरू होणार होळाष्टक शुभ की अशुभ

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो,

होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. होळीच्या आधीच्या 8 दिवसांना होळाष्टक म्हणतात. यावेळी 10 मार्चपासून होळाष्टक सुरू होणार आहे. होळाष्टक हा शब्द होळी आणि अष्टक मिळून बनला आहे.

होलाष्टकादरम्यान, गृहप्रवेश, जावळ काढण्याचा कार्यक्रम, लग्न, इत्यादी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. मात्र ही वेळ पूजेच्या दृष्टीने अतिशय शुभ मानली जाते. ज्योतिषांच्या मते, इतरही कारणे आहेत, ज्यामुळे होळाष्टकची वेळ शुभ कार्यासाठी योग्य मानली जात नाही. कोणती आहेत ती कारणे.

ज्योतिषांच्या मते, होळाष्टकच्या दिवसांमध्ये वातावरणात नकारात्मकतेचा प्रभाव असतो. सर्व ग्रहांचा प्रभाव नकारात्मक होतो. अष्टमी तिथीपासून होळाष्टक सुरू होते. अशा स्थितीत अष्टमीला चंद्र, नवमीला सूर्य, दशमीला शनि, एकादशीला शुक्र, द्वादशीला गुरु, त्रयोदशीला बुध, चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू खूप नकारात्मक राहतो.

सध्याच्या वातावरणाचा परिणाम व्यक्तीच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही होतो. ज्यामुळे एखादी व्यक्ती चुकीचा निर्णय घेऊ शकते. याशिवाय या काळात कोणतेही शुभ कार्य केले तरी ग्रहांच्या नकारात्मक प्रभावामुळे सहकार्य मिळू शकत नाही.

अशावेळी तुमचे काम बिघडू शकते. त्यामुळे होलाष्टकात देवाचे नाव घेणे आणि पूजा करणे हे अत्यंत शुभ आहे, परंतु शुभ कार्ये वर्ज्य आहेत. होळाष्टकाची एक कथा सांगितली जाते ती पुढीलप्रमाणे – हा प्रल्हाद नारायणाचा खूप मोठा भक्त होता पण त्याचे वडील हिरण्यकश्यपू हे मात्र त्याच्या भक्तीच्या विरोधात होते.

त्यांना मात्र त्यांच्या मुलाने श्री विष्णूची भक्ती करावी हे अजिबात पसंत नव्हतं. त्यामुळे ते प्रल्हादाचा अनेक प्रकारे छळ करत आणि या 8 दिवसांमध्ये त्यांनी प्रल्हादाचा अतोनात छळ केला. पण मात्र नारायणाच्या कृपेने त्यांना प्रल्हादाच्या केसांनाही धक्का लावता आला नाही.

पोर्णिमेच्या दिवशी चिडून त्यांनी आपली बहीण होलिकेला बोलावून प्रल्हादाला तिच्या मांडीवर ती बसून मारण्यास सांगितले.
होलिका प्रल्हादाला आपल्या मांडीत बसवतात ती आगीच्या जोलित भस्मसात झाली. प्रल्हादाला मात्र काही झाले नाही.

तेव्हापासून होलिका दहन हे दरवर्षी पौर्णिमेच्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. अष्टमी ते पौर्णिमा हे दिवस शुभ मानले जात नाही. मात्र पौर्णिमेनंतर रंगांची होळी खेळून चांगल्याचा विजय साजरा केला जातो.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *