पुर्ण आयुष्य आनंदात आणि सुखाने जगणाऱ्या लोकांच्या 7 सवयी

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

आज आपण आयुष्यात प्रत्येक कृती एका गोष्टीसाठी करतो. ती कोणती गोष्ट माहीत आहे, ती म्हणजे आनंद. पण प्रत्येक वेळेस आपणाला हवा असणारा आनंद मिळतो का? तुम्ही मनातल्या मनात उत्तर दया. कारण ज्याप्रकारे लोक आज स्ट्रेस आणि डिप्रेशन मध्ये चालली आहेत, ते बघता हा आनंद कुठेतरी हरवलाय असे जाणवते. मित्रांनो, आम्ही तुम्हाला आपल्या आयुष्यात आनंदी आणि सुखी राहणाऱ्या लोकांच्या 7 सवयी सांगणार आहोत.

त्याच्याकडे असे काय विशेष असते. हे जर तुम्ही समजावून घेतले तर तुम्हीदेखील आनंदी आणि सुखी राहू शकता. तर पाहूया त्याच्या त्या सवयी. आनंदी लोक प्रत्येकामध्ये चांगले शोधण्याचा प्रयत्न करतात, मग ती व्यक्ती असो किंवा परिस्थिती. मित्रांनो, डोळे बंद करून कमळाचे फूल डोळ्यासमोर आणा. तुम्हाला किती छान वाटेल, नाही का? पण तुम्ही जर विचार केला की, ज्याच्यामध्ये ते कमळ उमलते, त्या चिखलाचा विचार केलात तर तुम्हाला किळस येईल, घृणा वाटेल.

ही निवड आपल्या हातात आहे की आपण कुठे लक्ष द्यायचे. कमळावर की चिखलावर. बरेच लोकांची सवय असते की समोरच्या व्यक्तीच्या फक्त दुर्गुणावर लक्ष दयाचे. त्याच्या दोषांवर बोट ठेवायची. पण आनंदी लोक नेहमी समोरच्यामध्ये चांगले शोधायचे प्रयत्न करतात. प्रत्येक परिस्थितीमध्ये काय चांगले आहे, हे शोधायचे प्रयत्न करतात. त्यांना माहिती असते नकारार्थी व दुर्गुणाकडे गोष्टीकडे लक्ष देवून आपले मन खराब होणार आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीमध्ये किंवा परिस्थितीमध्ये चांगले शोधायचा प्रयत्न करा.

आनंदी लोक प्रत्येक कामाचा आनंद घेतात, त्यांना आवडत असो किंवा नसो आनंदी लोकांना प्रत्येक कामाचा आनंद घ्यायला आवडतो. हे लोक एकतर आवडीचे काम करतात किंवा जे काम आहे त्यामध्ये आनंद शोधायचा प्रयत्न करतात. आपला दिवसाचा जास्त वेळ कामामध्ये जातो. आणि तेच काम जर रडतखडत करत असू तर तुम्हाला कोणी आनंदी ठेवू शकत नाही. जी लोक आपल्या व्यवसायाचा, नोकरीचा आनंद घेतात त्याचा प्रत्येक दिवस उत्साहामध्ये सुरू होतो. त्यांना कसलीच भीती नसते. त्यामुळे एकतर आवडीचे काम करा. किंवा कामामध्ये आनंद शोधा.

आनंदी लोकांमध्ये लवचिकता असते. मित्रांनो, अनेकवेळा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही. अशावेळी आपली चिडचिड होते. आपण नशिबाला दोष देतो. दुःखी होतो. पण आनंदी असणारे लोक त्या सर्व गोष्टी लवकर स्विकारतात. आणि पुढच्या कामाला लागतात. त्यांच्यामध्ये लवचिकता असते ते आग्रह धरत नाही की, कोणतीही गोष्ट अशीच झाली पाहिजे तशीच झाली पाहिजे. कारण त्यांना माहिती असते आग्रह केल्याने त्रास आपल्यालाच होणार आहे. आनंदी लोक कुठल्याही परिवर्तनाला घाबरत नाही. त्यामुळे ते कोणताही परिस्थितीमध्ये सहज मिसळून जातात.

आनंदी लोकांमध्ये क्षमा मागायची आणि क्षमा करायची सवय असते. मित्रांनो, ही सवय सर्वांना आनंदी जास्त ठेवते. कारण हया सवयीमुळे आपली मनात कोणाचाही राग, द्वेष, तिरस्कार राहत नाही. आनंदी असणारे लोक छोटया छोटया गोष्टी मनाला लावून नाही घेत. वेळ आल्यावर ते आपल्या चुकीची माफी मागतात.

आणि दुसऱ्यांना माफ करतात. दुसऱ्यांना नाही स्वतःलासुद्धा ते माफ करतात. कारण माफी मागितल्याने आणि माफ केल्याने मन अतिशय हलके होते. मनामध्ये फालतू विचार आपल्याला त्रास देत नाही. आणि त्यामुळे तुम्ही सदैव खुश राहता.

आनंदी लोक नेहमी आपल्या आतल्या आवाजाचे ऐकतात. सगळे करतात म्हणून मी पण तेच करतो किंवा करते. हे आनंदी लोकांना आवडत नाही. सल्ले सर्वांकडून घेतात पण तेच करतात जे आतला आवाज सांगतो. कारण त्यांना आपल्या आतल्या आवाजावर पूर्ण विश्वास असतो. अशावेळी ते लोक काय म्हणतील ह्याचा विचार करत नाही.

आनंदी लोक कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवत नाही. आनंदी राहणारी लोक कोणावरही जास्त अवलंबून नसतात. आणि इतर कोणत्याही व्यक्तीकडे जास्त अपेक्षा ठेवत नाही. कारण त्यांना माहिती असते जेवढ्या जास्त अपेक्षा ठेवू तेवढे जास्त दुःखी होवू. कारण प्रत्येकवेळी आपल्या अपेक्षा साध्य होणार नाही. जेव्हा अपेक्षा भंग होते, तेव्हा मनामध्ये राग, द्वेष, ईर्षा, घृणा, तिरस्कार येतो आणि निराशादेखील होते. म्हणून अपेक्षा ठेवणे बंद करा. स्वतःवर विश्वास ठेवा.

आनंदी लोक आपली तुलना दुसऱ्याबरोबर करत नाही. मित्रांनो, आजच्या हया सोशल मीडियाच्या काळात लोकांचे सर्वात दुःखाचे कारण काय असेल. तर ते आहे दुसऱ्याबरोबर तुलना करणे. Facebook, instragram इत्यादींवर दुसऱ्याचे फोटो पाहून आपल्याला वाटते, की हे कुठे कुठे फिरायला जातात. मीच कुठे जात नाही. दुसऱ्यांनी कोणता मोबाईल घेतला, कोणती गाडी घेतली.

याकडे बारकाईने लक्ष ठेवणे व स्वतःकडे नाही म्हणून स्वतः च्या नशिबाला दोषी ठरविणे. आजकाल लोकांना स्वतःच्या दुःखाने त्रास होत नाही. तेवढा त्रास त्यांना दुसऱ्याचे सुख पाहून होतो. पण मित्रांनो, तुम्हाला आयुष्यात खरंच आनंदी राहायचे असेल तर स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर करू नका. हया निसर्गाने, परमेश्वराने प्रत्येकाला वेगळे बनवले आहे. प्रत्येकामध्ये काहीतरी विशेष गुण दिले आहेत. त्याच्यावर लक्ष केंद्रीत करून ते गुण विकसित करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, ह्या होत्या आनंदी आणि सुखी असणाऱ्या लोकांच्या 7 सवयी.

अश्याच उपयोगी आणि भन्नाट नवनवीन लेख रोज वाचण्यासाठी आताच आपले मराठीन्यूज हे फेसबुक पेज नक्की लाईक करा

धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *